शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
2
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
3
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
4
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
5
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
6
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
7
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
8
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
9
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
10
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
11
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
12
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
13
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
14
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
15
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
16
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
17
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
18
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
19
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
20
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?

बर्फ बनविण्याचा व्यवसाय आला संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:34 PM

गेल्या महिन्यापासून तापमानाने उचांक गाढला आहे. अंगाची लाहीलाही होणाऱ्या उष्णतेपासून बचावासाठी नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत. असे असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र थंड जार उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक त्यालाच पसंती देत आहे. यामुळे बर्फ व्यवसाय काहीसा अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देअनेकांना रोजगार : थंड पाणी घरपोच मिळत असल्याने व्यवसाय घटला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या महिन्यापासून तापमानाने उचांक गाढला आहे. अंगाची लाहीलाही होणाऱ्या उष्णतेपासून बचावासाठी नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत. असे असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र थंड जार उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक त्यालाच पसंती देत आहे. यामुळे बर्फ व्यवसाय काहीसा अडचणीत आला आहे.लग्न, दूधविक्रेते, रसवंतीगृह, शीतपेयांची दुकाने आदी व्यावसायिकांकडून उन्हाळ्यामध्ये बर्फाला मागणी असते, चंद्रपूर शहरामध्ये काही प्रमाणात आईस फॅक्टरी आहे. एका आईस फॅक्टरीमध्ये १० ते २० मजूर काम करतात. एप्रिल, मे आणि जून या तीनच महिन्यात बर्फाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यानंतर मात्र हा धंदा मंदावतो. यावर्षी असलेल्या दुष्काळामुळे काही प्रमाणात व्यवसायावर परिणाम पडला आहे.उन्हाळ्यातील तीन महिने वगळता इतर नऊ महिने ना नफा न तोटा या तत्वावरच बर्फाचा व्यवसाय करावा लागतो. मागील दोन वर्षांपासून सर्वत्र थंड जार उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक त्यालाच पसंती देत असून, हा व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. केवळ काही व्यावसायिकांच्या भरवश्यावरच हा व्यवसाय चालत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.४८ तासात होते एक लादी तयारबर्फाची एक लादी तयार होण्यासाठी ४८ तासांचा वेळ लागतो. दिवसभरात एका आईस फॅक्टरीतून ४० ते ५० लाद्या तयार होतात. लादी तयार करण्यामागे मोठी मेहनत असली तरी ३०० ते ३५० रुपये दराने विक्री कली जाते. व्यवसायात स्पर्धा असल्याने भावात चढउतार होत असतात.आधुनिक साधनांमुळे बर्फाला मागणी घटलीप्रत्येकाच्या घरी फ्रीज तसेच व्यावसायिकांकडे मोठा फ्रीज उपलब्ध झाल्यामुळे बर्फाला मागणी घटली आहे. ग्रामीण भागातही सिंगल फेज लाईटवर चालणारे डी फ्रीज लाईटवर चालणारे फ्रीज आल्यामुळे बर्फाची मागणी घटली. दूध विक्रेते, लग्न समारंभ, रसवंती चालकांकडूनच मागणी होते. इतर महिन्यात ना नफा ना तोटा तत्वावर व्यवसाय सुरु ठेवावा लागतो.केवळ उन्हाळ्यात मागणी वाढतेएप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तापमानात वाढ झालेली असते. लग्नाचे मुहूर्तही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे गार पाण्याची मागणी असल्याने लोक बर्फाची लादी घेऊन पाण्याच्या साठ्यात सोडतात.त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात बर्फाच्या लाद्यांना मागणीत वाढ होत असल्याचे आईस फॅक्टरी चालकांचे म्हणणे आहे.