शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

वनविभागाच्या शेकडो हेक्टर जमिनीचे झाले वाळवंट

By admin | Updated: November 28, 2015 01:57 IST

बल्लारपूर येथे वनविभागाचे सागवण लाकूड व तत्सम जातीचे लाकूड साठवणुकीचे मोठे आगार आहे.

अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरबल्लारपूर येथे वनविभागाचे सागवण लाकूड व तत्सम जातीचे लाकूड साठवणुकीचे मोठे आगार आहे. या आगारातून देशभरातील लाकडाचे व्यापारी लिलावाच्या माध्यमातून खरेदी-विक्रीची प्रक्रिया पार पाडतात. येथील शेकडो हेक्टरचा परिसर वृक्षलागवडीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. मात्र वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात न आल्याने परिसर ओसाड झाला असून वाळवंटाचे स्वरूप आले आहे. वनविभाग पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी व वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करीत आहे. वाढत्या प्रदूषणावर वृक्ष लागवड करून त्याचे जतन करण्याचे प्रभावी माध्यम आहे. यातूनच प्रदूषण नियंत्रीत करता येते. याच अनुषंगाने आगार परिसरात विशेष रोपवण अभियानांतर्गत हजारावर वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यावर वनविभागाच्या प्रशासनाने लाखोंचा निधी खर्च केला. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे आजघडीला या परिसराला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. वृक्षाचे जतन व संवर्धन करण्याचे काम कोणीही मनावर घेतले नाही. परिणामी लाखोंचा खर्च होऊनही वृक्षाला संजीवनी देता आली नाही.येथील वाहतुक व विपणन कार्यालयाचे तत्कालीन वनसंरक्षक अशोक खडसे यांची भूमिका परिसराला वनराईने नटविण्याची होती. तीन ते चार वर्षाच्या कालावधीत वृक्षाचे संवर्धन केल्यास वनराई आकारास येणार होती. वन उद्यानाचे स्वरूप आणण्याचा त्यांचा मानस होता. मात्र तीन महिन्यापूर्वी त्यांचे येथून स्थलांतर झाले. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या परिसरातील वृक्ष लागवड करण्यात आलेल्या भागाकडे कानाडोळा केला. यामुळे विविध प्रजातीची वृक्ष कोमात गेली आहेत तर काही जाण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे, त्यावेळी सहा लाख ४० हजार रुपये खर्च करून अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी येथील नर्सरीतून तीन ते चार वर्ष वाढ झालेली विविध प्रजातीचे कलमे खरेदी करण्यात आली होती. यामध्ये वनस्पती औषधी पोषक असणारे कदम, मोहगुणी रूद्राक्ष, आवळा, कडूलिंब, बदाम, रामफळ, चिकू, काळा जांभूळ आदींच्या कलमांचा समावेश होता. फळ झाडांसह अडद तत्सम जातींच्या वृक्ष कलामांची लागवड वनरक्षक खडके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती. त्यांचा तेव्हाचा प्रयत्न प्रेरणादायी होता. मात्र त्यांच्या प्रेरणादायी प्रयत्नाला हरताळ फासले आहे. यासंदर्भात वनसंरक्षक धारणकर यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत:च मात्र कोरडे पाषाण आॅगस्ट महिन्यात वाहतूक व विपणन आगार परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. आजतागायत याला तीन महिन्याचा कालावधी झाला. मात्र आजघडीला वृक्षारोपण करण्यात आलेल्या परिसराला अवकळा आली आहे. याला कारणीभूत कार्यरत अधिकारी व कर्मचारी वर्गाचा दुर्लक्षीतपणा आहे. त्यांनी वृक्ष संवर्धन करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वत:च मात्र कोरडे पाषाण’ याची प्रचिती आणून देत वनविभागाने आपलेच पितळ उघड केल्याचे येथे दिसून येते.