शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मानवी कल्याण हेच बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:19 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य उपेक्षित जनतेला विकासाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे जगभरातील अभ्यासक बुद्धविचारांकडे आकर्षित झाले आहेत. मानवी कल्याण हेच बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ आहे, असा सूर ६१ व्या धम्मचक्र अनुप्रर्वतन सोहळ्यातील धम्मप्रवचन प्रवचन सत्रात उमटला.

ठळक मुद्दे६२ वा धम्मचक्र अनुप्रर्वतन सोहळा : प्रबोधनसत्रात अभ्यासक, विचारवंतांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य उपेक्षित जनतेला विकासाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे जगभरातील अभ्यासक बुद्धविचारांकडे आकर्षित झाले आहेत. मानवी कल्याण हेच बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ आहे, असा सूर ६१ व्या धम्मचक्र अनुप्रर्वतन सोहळ्यातील धम्मप्रवचन प्रवचन सत्रात उमटला.यावेळी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी बौद्ध बौद्ध तत्त्वज्ञानाची प्रासंगिकता मांडली. बुद्धाला आशिया खंडाचा दीप म्हणून जगभरात ओळख आहे. दैववादी संकल्पनांची चिकित्सा करून त्यातील अनिष्टता अत्यंत सोप्या भाषेत विषद केली. सम्यक विचारच मानवी जीवनातील समस्या दूर करू शकते. दैवीशक्तीने जीवनाचा उत्कर्ष होत नाही, हा वैज्ञानिक विचार जगभरात पोहोचला. धम्म विचारातील शुद्धता टिकविण्यासाठी चुकीच्या विचारांचा प्रतिकार करणारी पिढी तयार होणे गरजेचे आहे, असे मत भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी व्यक्त केले. धम्म चळवळ आणि मानवता, विज्ञान व बौद्ध तत्त्वज्ञान, भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी पैलुंवर मान्यवरांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. सर्वसामान्य व्यक्तिला बौद्ध तत्त्वज्ञान समजावून सांगण्यासाठी युवापिढीने वाचन व चिंतन केले पाहिजे, याकडेही उपस्थितांनी लक्ष वेधले.बुद्ध तत्त्वज्ञान आणि आचरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरामागील ऐतिहासिकता या विषयांवर दिवसभरात प्रबोधनसत्र घेण्यात आल होते. प्रारंभी अरुण घोटेकर यांनी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. सामूहिक बुद्ध वंदनेनंतर धम्मप्रवचन सत्राचा समारोप झाला. डॉ. आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या दीक्षाभूमीवर जिल्ह्यातूनच नाहीतर विदर्भातील असंख्य बौद्ध बांधव डॉ. आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी दीक्षाभूमीवर उपस्थित होते. त्यामुळे पवित्र स्थळावर कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात पोलिसांचा ताफा दीक्षाभूमीवर सज्ज होता. यामध्ये सात पोलीस निरिक्षक, ५० सहाय्यक पोलीस निरिक्षक यांच्यासमवेत ४५० महिला व पुरुष पोलीस शिपाई दीक्षाभूमी परिसरात कर्तव्यावर होते.दीक्षाभूमीवर धम्म संदेशाचे जत्थेमैत्री व करुणेचा धम्मसंदेश देण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो तरूणांचे जत्थे दिवसभर दीक्षाभूमीवर येत होते. प्रबोधनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करणाऱ्या युवक-युवतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पथनाट्यही सादर केले. दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाºया बौद्धबांधवांना अडचणी येऊ नये, याकरिता स्वयंसेवकांकडून मदत केल्या जात होती.बुद्ध-भीम गीतांचे तरूणाईला वेडदीक्षाभूमी परिसरात बुद्ध-भीम गीतांमधून जनजागृती करण्यात आली. वामनदादा कर्डक, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या विद्रोही गीतांनी आंबेडकरी अनुयायांच्या मनात परिवर्तनाची ज्योत पेटविण्याचे काम कलावंतांनी दिवसभर केले. कव्वाल साहेबराव येरेकर यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कव्वाली सादर केली. अन्य कलावंतांनी दमदार गायकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मान्यवर गायक व कलावंतांच्या ध्वनीफित विक्रीलाही दीक्षाभूमीवर उधाण आले होते.जिल्हा परिषदकडून जनजागृतीजिल्हा परिषद आरोग्य विभाग, सामाजिक व सेवाभावी संस्थांकडून आरोग्य तपासणीकरिता स्टॉल लावण्यात आले होते. याशिवाय कृषी, समाजकल्याण विभागाकडून शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत होती. संबंधित कर्मचाºयांकडून नागरिकांना जागृती पत्रके वितरण करण्यात आली.विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात प्रथमोपचार केंद्राचा स्टॉल लावण्यात आला होता. रोजगार वाटांची माहिती मिळावी, याकरिता बानाई व कर्मचारी संघटनांनी मार्गदर्शन केंद्र सुरू केले. या केंद्रांमधून युवक-युवतींनी रोजगार संधीची माहिती देण्यात आली. दोन दिवसांमध्ये सुमारे हजारो युवकांनी तज्ज्ञांनाकडून मार्गदर्शन घेतले.