भूविकास बॅंकेच्या कर्मचार्यांचे पुन्हा किती जीव घेणार ?
By Admin | Updated: May 19, 2014 23:22 IST2014-05-19T23:22:49+5:302014-05-19T23:22:49+5:30
यापूर्वी भूविकास बँकेच्या अनेक कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या. आर्थिक अडचणी व भविष्याची शास्वती नसल्यामुळे चिंताग्रस्त होवून अनेक कर्मचार्यांना हृदयविकाराचा

भूविकास बॅंकेच्या कर्मचार्यांचे पुन्हा किती जीव घेणार ?
चंद्रपूर : यापूर्वी भूविकास बँकेच्या अनेक कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या. आर्थिक अडचणी व भविष्याची शास्वती नसल्यामुळे चिंताग्रस्त होवून अनेक कर्मचार्यांना हृदयविकाराचा धक्का बसून त्यात त्यांचा बळी गेला. ३0 एप्रिलला अमरावती येथील कर्मचारी राजेंद्र काळबांधे यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्र सरकार आणखी किती कर्मचार्यांचे जीव घेणार, असा प्रश्न भूविकास बँक कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष गणपत सत्रे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील १७ वर्षांपासून बँकेचा व्यवसाय, कर्जवाटप बंद आहे. आठ वर्षांपासून कर्मचार्यांचे पगार अनियमित आहे. आजघडीला २४ महिन्यांचा पगार थकित असून नवृत्त कर्मचार्यांची देणी सहा वर्षांपासून मिळालेली नाही. कधी मिळणार याची निश्चिती नाही. त्यामुळे कर्मचार्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न, व्यवसाय, धंदा, नोकरीत अडचण निर्माण झाली आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने कर्मचार्यांच्या दोन पिढय़ांचा उद्ध्वस्त केले आहे. यापूर्वी कर्मचारी संघटना, शेतकरी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्व प्रकारची आंदोलने केली. आठ वर्षांपासून सतत मागणी आंदोलने विधानसभेत प्रश्न मांडून पाठपुरावा केलेला आहे. नागपूर अधिवेशनामध्ये आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सहकार मंत्र्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. मात्र तरीही बॅंक कर्मचार्यांच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वेळी आश्वासने दिली. परंतु आश्वासनाची पूर्तता आजवर झाली नसल्याचा आरोप सत्रे यांनी केला आहे. २४ महिन्यांपासून थकित असलेले पगार त्वरित देण्यात यावे, सहा वर्षांपासून न मिळालेली देणी नवृत्त कर्मचार्यांना त्वरित देण्यात यावी, बँक तोट्यात असताना राज्यस्तरीय बँकेचे सन २00१ ला जिल्हावार विभाजन करण्यात आले हे चुकीचे असून विभाजन रद्द करण्यात यावे, अशा मागण्या आहेत. (प्रतिनिधी)