आणखी किती वर्ष बसस्थानकाची प्रतीक्षा?

By Admin | Updated: December 21, 2014 22:57 IST2014-12-21T22:57:31+5:302014-12-21T22:57:31+5:30

तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ व नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त असलेल्या गडचांदूर शहरात अद्यापही बसस्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न पडतो. शेकडो विद्यार्थी व प्रवासी बसची

How many years wait for a bus station? | आणखी किती वर्ष बसस्थानकाची प्रतीक्षा?

आणखी किती वर्ष बसस्थानकाची प्रतीक्षा?

आशिष देरकर - गडचांदूर
तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ व नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त असलेल्या गडचांदूर शहरात अद्यापही बसस्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न पडतो. शेकडो विद्यार्थी व प्रवासी बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे राहतात. मागील दोन दशकांपासून असलेली बसस्थानकाची मागणी अजुनपर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे आणखी बसस्थानकासाठी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न येथील नागरिक तथा प्रवाशी करीत आहे. शहराला नगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाल्याने आतातरी बसस्थान होईल, अशी आशा येथील नागरिक बाळगून आहे.
गडचांदूर शहर कोरपना तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. माणिकगड, अल्ट्राटेक, अंबुजा व मुरली अ‍ॅग्रो या चारही सिमेंट कंपन्या गडचांदूरच्या अवती-भोवती आहे. त्यामुळे गडचांदूरला विशेष महत्त्व आहे. कोरपना व जिवती या दोन्ही तालुक्यातील ग्राहकांना कोणत्याही वस्तूंच्या खरेदीकरिता गडचांदूरला आल्याशिवाय पर्याय नाही. गडचांदुरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बसस्थानकावरील गर्दीवरून या शहराचे महत्व कळते.
कोरपना व जिवती तालुक्यातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ग्राहकांचा, विद्यार्थ्यांचा व प्रवाशांचा संबंध बसस्थानकाशी येतो. मात्र येथील २५ बाय ८ क्षेत्रफळाच्या बसस्थानकात या सर्वांनी आसरा घ्यायचा कसा, असा प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात आधीच लहान क्षेत्रफळ असलेल्या या बसस्थानकात राजुरा आगाराचे छोटे कार्यालयसुद्धा सुरू करण्यात आल्याने जागा आणखी कमी झाली आहे.
गडचांदूर येथे महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, शरद पवार कला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय, दोन अध्यापक विद्यालये, बी.एड. महाविद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गडचांदुरात शिक्षण घेण्याकरिता आल्याशिवाय पर्याय नाही.
शहराच्या वाढत्या महत्वानुसार येथे कित्येक वर्षापूर्वीच मोठे बसस्थानक होणे आवश्यक होते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते होऊ शकले नाही. परिणामी प्रवाशांना मागील अनेक वर्षांपासून त्रास सहन करीत बसची वाट बघावी लागते. आता नगर परिषदेचा दर्जा मिळाल्याने बसस्थानक होतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: How many years wait for a bus station?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.