शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती...
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
5
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
6
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
7
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
8
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
9
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
10
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
11
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
12
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
13
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
14
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
15
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
16
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
17
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
18
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
19
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
20
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी

भाविकांचे आकर्षण ठरतोय घोडा रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:08 IST

३९२ वर्र्षांच्या इतिहासाची दीर्घ परपंरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराची महाराष्ट्राचा तिरूपती बालाजी म्हणून ओळख आहे. रविवारी वसंत पंचमीला यात्रा सुरू होणार असून हजारो भाविक सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्दे३९२ वर्षांची परपंरा : रविवारपासून यात्रेला सुरूवात

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ३९२ वर्र्षांच्या इतिहासाची दीर्घ परपंरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराची महाराष्ट्राचा तिरूपती बालाजी म्हणून ओळख आहे. रविवारी वसंत पंचमीला यात्रा सुरू होणार असून हजारो भाविक सहभागी होणार आहेत.१७०४ मध्ये चिमूर येथील शेतकरी भिकुजी डाहुले पाटील यांनी जनावरांच्या गोठ्यासाठी जमीन खोदायला सुरुवात केली. एका जागेवर कुदळ मारताच धातुचा आवाज आला. तेव्हा पाटलांनी खोदकाम थांबविले. रात्री स्वप्न पडल्यानंतर खोदकामाला सुरूवात केली. खोदकामामध्ये एक सुंदर मूर्ती आढळली, अशी आख्यायिका पूर्वजांकडून सांगितली जाते. जानोजी भोसले यांनी पेशव्यांचे सरदार देवाजी पंत चोरघडे यांच्या विनंतीवरून १७५० मध्ये चिमूर येथे २०० एकर जमीन मंदिर उभारणीसाठी दान दिली. तटबंदीयुक्त असलेल्या मंदिराला उंच प्रवेशद्वार असुन त्यावर कोरीव काम केले आहे. लाकडी सभा मंडपात १२ खांब आहेत. हत्ती व वाघाचे चित्र कोरण्यात आले. चार दगडी खांब असलेला सभामंडप आहे. श्रीहरी बालाजी श्री मूर्ती आणि तिरूपती बालाजीची मूर्ती सारखीच आहे. मंदिराच्या आवारात एक गरूड खांब आहे. बाहेर काही पुजाऱ्यांच्या समाध्या बांधल्या आहेत. श्री बालाजी महाराज मंदिरात दरवर्षी माघ शुद्ध पंचमीला नवरात्र प्रारंभ होते. माघ त्रयोदशीला रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत भव्य लाकडी घोडा रथावरून श्रीहरी बालाजी महाराजाच्या प्रतिमेची शहरातून मिरवणुक काढली जाते. मिरवणुकीला ‘रातघोडा’ असे म्हणतात.रातघोडा उत्सवाला हजारो भाविक उपस्थित राहून दर्शन घेतात. तिसºया दिवशी दुपारी १२ ते ३ वाजता दरम्यान गोपालकाला करून मुख्य यात्रेचा समारोप करण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र घोडा रथयात्रा सलग १५ दिवस सुरू राहते. महाशिवरात्रीला यात्रेची सांगता होते. घोडा रथयात्रेत विविध प्रकारच्या मनोरंजनाचे खेळ लावल्या जातात. सर्कस, आकाश पाळणा, खेळण्यांची विविध दुकाने व मिना बाजारात मोठी गर्दी उसळते. यात्रेत सहभागी होणाºया भाविकांसाठी नगरपरिषद, स्वयंसेवी संघटना तसेच लोकप्रतिनिधींकडून सोईसुविधा पुरविल्या जातात.धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलवसंत पंचमीला रविवारी रात्री ८ ते १० वाजता विनोदबुवा खोंड महाराज यांचे नारदीय कीर्तन होणार आहे. १७ फेब्रुवारीला रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत रातघोड्याची मिरवणूक निघेल. धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचल राहणार आहे. २० फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ वाजतादरम्यान गोपालकाला कीर्तन झाल्यानंतर यात्रेची सांगता होईल. यात्रा महोत्सव महाशिरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.