धानोलीवासीयांच्या मतदानाच्या आशा मावळल्या

By Admin | Updated: May 10, 2014 00:08 IST2014-05-10T00:08:22+5:302014-05-10T00:08:22+5:30

लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या वेळी मतदान केंद्र ऐनवेळी बदलविण्यात आल्याच्या निषेधार्थ वरोरा विधान क्षेत्रातील धानोली ...

The hope of voting for the Dhanlivis will be overwhelming | धानोलीवासीयांच्या मतदानाच्या आशा मावळल्या

धानोलीवासीयांच्या मतदानाच्या आशा मावळल्या

वरोरा : लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या वेळी मतदान केंद्र ऐनवेळी बदलविण्यात आल्याच्या निषेधार्थ वरोरा विधान क्षेत्रातील धानोली गावातील मतदारांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी निवडणूक आयोगाकडे निवेदन पाठवून पुनश्च मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. परंतु महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील मतदान नुकतेच आटोपल्याने आता धानोली येथे मतदान होणार नाही, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. त्यामुळे मतदानाबाबतच्या धानोलीवासियांच्या आशा मावळल्या असल्याचे मानले जात आहे. ७५ वरोरा विधानसभा क्षेत्रांतर्गत धानोली गाव येत असून मतदारांची संख्या जवळपास ९५० आहे. १९५२ पासून धानोली जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रत्येक निवडणुकीचे मतदान केंद्र ठेवण्यात येते. धानोली मतदान केंद्राला नजिकचे वाघेडा गाव जोडण्यात येते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानापूर्वी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाणे सुकर व्हावे, याकरिता मतदान क्रमांक, केंद्र क्रमांक व यादी भाग क्रमांक तसेच मतदारांचे छायाचित्र असलेल्या चिट्ठ्या वाटप करण्यात आल्य्टÞ त्यावर जि.प. शाळा धानोली मतदान केंद्र नमूद करण्यात आले. परंतु मतदानाच्या एक दिवसापूर्वी मतदान घेणारी चमू आली. त्यांच्या आदेशात मतदान केंद्र धानोली ऐवजी वाघेडा शाळा असा उल्लेख करण्यात आला. मतदानाच्या एक दिवस आधी धानोलीतील मतदारांना वाघेडा येथे मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. धानोली ते वाघेडा या गावामध्ये सहा किलोमिटरचे अंतर आहे. धानोली गाव मोठे असून तसेच १९५२ पासून असलेल्या मतदान केंद्र बदलविण्यात आल्याने त्याच दिवशी धानोली ग्रामपंचायतीने तातडीने सभा घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. प्रशासनातील अधिकारी व काही लोकप्रतिनिधींनी धानोली गावात धाव घेवून मतदान करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु धानोली येथील मतदारांनी प्रतिसाद दिला नाही व आपला बहिष्कार कायम ठेवला. ग्रामस्थांच्यावतीने धानोली केंद्रावर मतदान घेण्याकरिता निवेदन निवडणूक आयोग व स्थानिक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिले. परंतु २४ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा संपला. त्यानंतरही धानोलीमध्ये मतदान घेण्याबाबत कुठलाही आदेश आला नसल्याची माहिती ग्रामस्थांनी .दिली त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून मतदार वंचित राहणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The hope of voting for the Dhanlivis will be overwhelming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.