शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार टाच दुखतेय; कधी हा उपाय करून पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:47 IST

Chandrapur : काय काळजी घ्याल?

चंद्रपूर : बदललेली दिनचर्या, व्यायामाकडे दुर्लक्ष, वाढते वजन आणि उंच टाचांची चप्पल या व अशा कारणांमुळे टाचदुखीचे रुग्ण वाढत आहेत. आता तर अगदी कमी वयापासूनच टाचदुखीच्या समस्येने रुग्ण त्रस्त आहेत. काही जण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, हे दुर्लक्ष कधीकधी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे टाचदुखी असेल तर जीवनशैली बदलून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टाचदुखीकडे वेळीच लक्ष द्या.

तळपायाचे आजार कोणते ?तळपायांना अनेक आजार होऊ शकतात, जसे की प्लांटार फेसिआइटिस (टाचा दुखणे), मॉर्टन न्यूरोमा (पायाच्या बोटांमध्ये वेदना), प्लांटार मस्से (विषाणूमुळे होणारा त्वचेचा त्रास) आणि इतर अनेक समस्या.

कारणे काय ?

  • अतिवजन : व्यक्तीचे वजन वाढल्यास शरीरावर भार येतो. त्यामुळे टाचदुखीचा त्रास वाढतो.
  • हाड वाढल्यावर : टाचेच्या आतले हाड अनेकवेळा वाढते. त्यामुळे देखील टाचदुखीचा त्रास होत असतो.
  • नेहमी उभे राहण्याचे काम : दीर्घकाळ उभे राहणे किंवा कठीण पृष्ठभागावर चालण्यामुळेही दुखणे वाढते.

काय काळजी घ्याल?

  • हे टाळा : शक्यतो जास्त वेळ उभे राहणे टाळावे, त्रास वाढल्यास जॉगिंग, धावणे टाळावे, युरिक अॅसिड वाढल्यामुळे हा त्रास होतो. त्यामुळे युरिक अॅसिड वाढेल असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. अपुरा आधार किवा चुकीचे फिट असलेले बूट, उंच टाचेच्या चपला वापरल्यानेही टाचदुखी होऊ शकते. अशा वेळी तळव्याच्या रचनेनुसार चप्पल-बूट वापरले पाहिजेत. बुटांमधे हिल कप्स किंवा स्कूप्ड हिल्सचा वापर करावा, यामुळेही हा त्रास कमी होऊ शकतो.
  • हे कराः नियमित योगासने केली पाहिजेत. भिंतीला हात टेकवून पायाच्या बोटांवर उभे राहावे आणि टाचा वर उचलाव्यात. या अशा स्थितीमध्ये जागच्या जागी जॉगिंग करायचा प्रयत्न करावा. तळव्याखाली छोटा बॉल घेऊन तो रोल करीत राहावे, यामुळे त्रास कमी होईल. नियमित व्यायाम करणेही गरजेचे आहे.

"टाचदुखीचे मुख्य कारण शरीराचे वाढलेले वजन असू शकते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. सोबतच नियमित व्यायाम, योगासन करावे, अधिक वेळ उभे राहून नियमित काम करायचे असेल तर दर काही वेळाने पायांना आराम द्यावा. घरामध्ये विशेषतः स्टाइलवरून चालताना पायामध्ये मऊ चप्पल, स्लीपलचा वापर करावा."- डॉ. विनोद मुसळे, अस्थिरोगतज्ज्ञ, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरHealth Tipsहेल्थ टिप्स