शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

वारंवार टाच दुखतेय; कधी हा उपाय करून पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:47 IST

Chandrapur : काय काळजी घ्याल?

चंद्रपूर : बदललेली दिनचर्या, व्यायामाकडे दुर्लक्ष, वाढते वजन आणि उंच टाचांची चप्पल या व अशा कारणांमुळे टाचदुखीचे रुग्ण वाढत आहेत. आता तर अगदी कमी वयापासूनच टाचदुखीच्या समस्येने रुग्ण त्रस्त आहेत. काही जण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, हे दुर्लक्ष कधीकधी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे टाचदुखी असेल तर जीवनशैली बदलून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टाचदुखीकडे वेळीच लक्ष द्या.

तळपायाचे आजार कोणते ?तळपायांना अनेक आजार होऊ शकतात, जसे की प्लांटार फेसिआइटिस (टाचा दुखणे), मॉर्टन न्यूरोमा (पायाच्या बोटांमध्ये वेदना), प्लांटार मस्से (विषाणूमुळे होणारा त्वचेचा त्रास) आणि इतर अनेक समस्या.

कारणे काय ?

  • अतिवजन : व्यक्तीचे वजन वाढल्यास शरीरावर भार येतो. त्यामुळे टाचदुखीचा त्रास वाढतो.
  • हाड वाढल्यावर : टाचेच्या आतले हाड अनेकवेळा वाढते. त्यामुळे देखील टाचदुखीचा त्रास होत असतो.
  • नेहमी उभे राहण्याचे काम : दीर्घकाळ उभे राहणे किंवा कठीण पृष्ठभागावर चालण्यामुळेही दुखणे वाढते.

काय काळजी घ्याल?

  • हे टाळा : शक्यतो जास्त वेळ उभे राहणे टाळावे, त्रास वाढल्यास जॉगिंग, धावणे टाळावे, युरिक अॅसिड वाढल्यामुळे हा त्रास होतो. त्यामुळे युरिक अॅसिड वाढेल असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. अपुरा आधार किवा चुकीचे फिट असलेले बूट, उंच टाचेच्या चपला वापरल्यानेही टाचदुखी होऊ शकते. अशा वेळी तळव्याच्या रचनेनुसार चप्पल-बूट वापरले पाहिजेत. बुटांमधे हिल कप्स किंवा स्कूप्ड हिल्सचा वापर करावा, यामुळेही हा त्रास कमी होऊ शकतो.
  • हे कराः नियमित योगासने केली पाहिजेत. भिंतीला हात टेकवून पायाच्या बोटांवर उभे राहावे आणि टाचा वर उचलाव्यात. या अशा स्थितीमध्ये जागच्या जागी जॉगिंग करायचा प्रयत्न करावा. तळव्याखाली छोटा बॉल घेऊन तो रोल करीत राहावे, यामुळे त्रास कमी होईल. नियमित व्यायाम करणेही गरजेचे आहे.

"टाचदुखीचे मुख्य कारण शरीराचे वाढलेले वजन असू शकते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. सोबतच नियमित व्यायाम, योगासन करावे, अधिक वेळ उभे राहून नियमित काम करायचे असेल तर दर काही वेळाने पायांना आराम द्यावा. घरामध्ये विशेषतः स्टाइलवरून चालताना पायामध्ये मऊ चप्पल, स्लीपलचा वापर करावा."- डॉ. विनोद मुसळे, अस्थिरोगतज्ज्ञ, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरHealth Tipsहेल्थ टिप्स