शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मुसळधार पावसाने आक्सापूर येथील दोन तलावांची पाळ फुटली, पेरणी केलेली पिके वाहून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 12:25 IST

शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

आक्सापूर (चंद्रपूर) : सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आक्सापूर येथील मामा तलाव व रान तलाव अशा दोन्ही तलावांची मधोमध पाळ फुटल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

गोंडपिपरीं तालुक्यातील आक्सापूर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने मामा तलाव व रान तलाव या दोन्ही तलावाची पाळ फुटल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या धान रोवणी सुरू असल्याने दिवसभर शेतकरी शेतातून घरी आले होते, आणि ही घटना रात्री घडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेतामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि पाण्याच्या प्रवाहाने शेतातील रोवणी केलेले धान व पऱ्हे वाहून गेले. सदर घटनेची माहिती कळताच कोठारी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास गायकवाड, सिंचन विभागाचे अधिकारी प्रियंका रायपुरे, उपविभागीय अधिकारी स्नेहल राहटे, तहसीलदार शुभम बहाकर, देवराव भोंगळे यांनी प्रत्यक्ष तलावावर जाऊन पाहणी केली.

करंजी येथे घरात शिरले पाणी

आक्सापूरपासून दोन किमी अंतरावर असलेल्या करंजी येथे बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो घरात पाणी घुसले व घरातील साहित्य पूर्णपणे भिजले. काही घरांची पडझड झाली. करंजीवासीयांना रात्र जागत काढावी लागली. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करंजी ग्रामपंचायतीचे सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समीर निमगडे यांनी केली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी