शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अभ्यासिका अन् वसतिगृहासाठी त्यांनी खुले केले स्वत:चे घर; गावतुरे कुटुंबीयांचा उपक्रम

By परिमल डोहणे | Updated: September 25, 2022 16:01 IST

वसतिगृहाची समस्या मिटली

चंद्रपूर : सत्यशोधक दिनाच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. गावतुरे दाम्पत्यांनी यांच्या मूल येथील घराचा अर्धा भाग होतकरू गरीब विद्यार्थिनींसाठी वसतिगृह निर्माण करण्यासाठी तर अर्धा भाग अभ्यासिकेसाठी उपलब्ध करून दिला. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांची मोठी सोय उपलब्ध झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक २४ सप्टेंबर रोजी झाला. तसेच महात्मा फुले यांनी शुद्र अतिशुद्रांना मनुवाद्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याला १५० वर्ष होत असल्याने सत्यशोधक समाज वर्धापन दिनाच्या उत्सवच साजरा न करता विधायक काम करावे, या अनुषंगाने गावतुरे कुटुंबीयांनी आपले घराचा अर्धा भाग वसतिगृहासाठी व अर्धा भागात अभ्यासिका तयार करून गरजू विद्यार्थ्यांसाठी खुले केले. अखिल भारतीय माळी महासंघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, भूमिपुत्र ब्रिगेड आणि सत्यशोधक युवा मंचने शनिवारी मूल येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी समाजसेविका बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, रामभाऊ महाडोळे, नत्थूजी सोनुले, प्रा. विजय लोणबले, साहित्यिक ब्रह्मनंद मळावी, प्रल्हाद कावळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता प्रा. गुलाब मोरे, ज्ञानज्योती फाउंडेशनचे दिनकर मोहुर्ले, हिरालाल भडके उपस्थित होते. महात्मा फुले व सावित्रीआईच्या कार्याचा आदर्श पुढे ठेवून समाजाचे दुःख व त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रत्येकांनी झटावे, असे प्रतिपादन डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी केले. यावेळी ज्येष्ठ सत्यशोधक प्रल्हाद कावळे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक ॲड. प्रशांत सोनुले, संचालन डॉ. दीपक जोगदंड यांनी केले.

१५० गावांत सत्यशोधक शिबिर राबविणार

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केल्याला २४ सप्टेंबर रोजी १५० वर्षांत पदार्पण होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील १५० गावांत सत्यशोधक प्रबोधन शिबिर घेण्यात येणार आहेत. तसेच गावागावांत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये व अभ्यासिका तयार करण्यासाठी तसेच सत्यशोधक युवा मंच तयार करणे, असे तीन संकल्प यावेळी घेण्यात आले.