शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
2
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
3
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
4
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
5
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
6
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
7
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
8
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
9
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
10
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
11
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
12
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
13
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
14
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
15
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
16
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
17
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
18
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
19
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
20
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासिका अन् वसतिगृहासाठी त्यांनी खुले केले स्वत:चे घर; गावतुरे कुटुंबीयांचा उपक्रम

By परिमल डोहणे | Updated: September 25, 2022 16:01 IST

वसतिगृहाची समस्या मिटली

चंद्रपूर : सत्यशोधक दिनाच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. गावतुरे दाम्पत्यांनी यांच्या मूल येथील घराचा अर्धा भाग होतकरू गरीब विद्यार्थिनींसाठी वसतिगृह निर्माण करण्यासाठी तर अर्धा भाग अभ्यासिकेसाठी उपलब्ध करून दिला. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांची मोठी सोय उपलब्ध झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक २४ सप्टेंबर रोजी झाला. तसेच महात्मा फुले यांनी शुद्र अतिशुद्रांना मनुवाद्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याला १५० वर्ष होत असल्याने सत्यशोधक समाज वर्धापन दिनाच्या उत्सवच साजरा न करता विधायक काम करावे, या अनुषंगाने गावतुरे कुटुंबीयांनी आपले घराचा अर्धा भाग वसतिगृहासाठी व अर्धा भागात अभ्यासिका तयार करून गरजू विद्यार्थ्यांसाठी खुले केले. अखिल भारतीय माळी महासंघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, भूमिपुत्र ब्रिगेड आणि सत्यशोधक युवा मंचने शनिवारी मूल येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी समाजसेविका बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, रामभाऊ महाडोळे, नत्थूजी सोनुले, प्रा. विजय लोणबले, साहित्यिक ब्रह्मनंद मळावी, प्रल्हाद कावळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता प्रा. गुलाब मोरे, ज्ञानज्योती फाउंडेशनचे दिनकर मोहुर्ले, हिरालाल भडके उपस्थित होते. महात्मा फुले व सावित्रीआईच्या कार्याचा आदर्श पुढे ठेवून समाजाचे दुःख व त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रत्येकांनी झटावे, असे प्रतिपादन डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी केले. यावेळी ज्येष्ठ सत्यशोधक प्रल्हाद कावळे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक ॲड. प्रशांत सोनुले, संचालन डॉ. दीपक जोगदंड यांनी केले.

१५० गावांत सत्यशोधक शिबिर राबविणार

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केल्याला २४ सप्टेंबर रोजी १५० वर्षांत पदार्पण होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील १५० गावांत सत्यशोधक प्रबोधन शिबिर घेण्यात येणार आहेत. तसेच गावागावांत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये व अभ्यासिका तयार करण्यासाठी तसेच सत्यशोधक युवा मंच तयार करणे, असे तीन संकल्प यावेळी घेण्यात आले.