शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शबरी, रमाई योजनेसाठी अर्ज केला का? घरकुल घ्या घरकुल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:06 IST

गरजू घरकूल लाभार्थीना दिलासा : उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वंचितांना घरकुल मिळावे, यासाठी शासनातर्फे रमाई आवास, मोदी आवास, शबरी घरकुल आवास आदी योजना राबविल्या जातात. २०१६ ते २०२४ या कालावधीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला रमाई आवास योजनेंतर्गत २५ हजार १४४ लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर शबरी योजनेंतर्गत २२ हजार ७६५ लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दोन्ही योजनांची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे बेघरांना मोठा आधार मिळाला आहे.

शासनाने रमाई, शबरी योजनेंतर्गत लाभार्थीना घरकुल मंजूर केले असले तरीही जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नाही. परिणामी घरकुलासाठी लाभार्थीना रेती मिळणे कठीण झाल्याने अनेक घरे अपूर्ण आहेत

वर्ष                          रमाई योजना उद्दिष्ट मंजूर                    शबरी योजना उद्दिष्ट मंजूर२०१६-१७                         १२५२                                                       ७८८२०१७-१८                         २०००                                                        १७२                                     २०१८-१९                         ८७४१                                                        १७२२०१९-२०                         ६८८०                                                        ४०५०               २०२१-२२                         ३४५६                                                        ८३४२०२३-२४                         २८२५                                                        ८६६६एकूण                            २५१५४                                                   २३१८२  

निकष काय?■ शबरी योजना : आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी, तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थीना घरकुल उपलब्ध करण्यात येते.

■ रमाई योजना : अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचावे व त्याचे निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्याच्या स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या जागेवर २६९ चौरस फुटांचे पक्के घर बांधावे लागते.

अडचण काय?■ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असले तरी अनेक गावांतील घरकुल लाभार्थीना मोफत रेती उपलब्ध झाली नाही.■ पावसाळ्यापूर्वी घरकुलाचे काम पूर्ण कसे करायचे, या विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.

अर्ज कोठे करायचा?पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद, डीआरडीए, या ठिकाणी घरकुलाच्या लाभासाठी अर्ज करता येतो. ग्रामपंचायत कार्यालयातही अनेकजण अर्ज करतात. सर्व दस्तऐवज जोडून अर्ज करावा लागतो.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाchandrapur-acचंद्रपूर