शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील नोटरीवरील गुंठेवारी व्यवहार नियमानुकूल होणार; मुद्रांक शुल्क अभय योजना

By राजेश मडावी | Updated: January 17, 2024 18:15 IST

शहरात गुंठेवारीची बहुतांश प्रकरणे नोटरीद्वारे झाली आहेत. ही प्रकरणे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना सुरू केली.

चंद्रपूर : शहरात गुंठेवारीची बहुतांश प्रकरणे नोटरीद्वारे झाली आहेत. ही प्रकरणे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना सुरू केली. गुंठेवारी प्रकरणातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी केले. शुक्रवारी, दि. १२ याबाबत मनपा कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती.

चंद्रपूर शहरातील जी गुंठेवारी प्रकरणे आहेत त्यात व्यवहार हे नोटरीद्वारे केली आहेत. ज्या नागरिकांनी गुंठेवारी प्रकरणात नोटरीद्वारे व्यवहार केले त्यांना नियमित करण्याची संधी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजनेद्वारे मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजपत्रात अधिसूचित केलेल्या ७ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन आदेशाच्या अनुषंगाने महसूल व वनविभागाने ११ डिसेंबर रोजी परिपत्रक काढून योजनेबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना जारी केल्या आहेत.

१ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या वर्षामध्ये निष्पादित केलेल्या दस्तांमध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्यात येऊन व त्यावरील दंडाची रक्कम देखील संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे. यासंबंधी मनपा कार्यालयात मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांच्या अध्यक्षतेखालील सभेत विविध पैलूंवर चर्चा झाली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, सहायक संचालक, नगररचना सुनील दहिकर, सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अंकिता तांदुळे, भूमी अभिलेख उपअधीक्षक मिलिंद राऊत, सहायक दुय्यम निबंधक बी.एन.माहोरे, नरेंद्र बोके, सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते उपस्थित होते.

असे आहे योजनेचे स्वरूप

कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही १ लाखापेक्षा जास्त असलेल्या प्रकरणांत कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के सूट देऊन त्यावरील दंडाची संपूर्ण रक्कम माफ करण्यात आली आहे. १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत निष्पादित केलेल्या दस्तांच्या बाबतीत कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये २५ टक्क्यांपर्यंत सूट आणि दंड हा नाममात्र २५ लाख ते १ कोटी रुपये मर्यादेपर्यंतच वसूल करण्यात येणार आहे. दंडाची रक्क्म त्यापेक्षा जास्त असल्यास ती संपूर्णपणे माफ केली जाणार आहे.

अशी आहे अट

मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत दस्त हा कोणत्याही रकमेच्या मुद्रांक पेपरवर निष्पादित झालेला असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला अर्ज करता येणार नाही. यासंबंधी आढावा बैठकीत मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी विविध सूचना देऊन योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.