शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

चंद्रपुरातील नोटरीवरील गुंठेवारी व्यवहार नियमानुकूल होणार; मुद्रांक शुल्क अभय योजना

By राजेश मडावी | Updated: January 17, 2024 18:15 IST

शहरात गुंठेवारीची बहुतांश प्रकरणे नोटरीद्वारे झाली आहेत. ही प्रकरणे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना सुरू केली.

चंद्रपूर : शहरात गुंठेवारीची बहुतांश प्रकरणे नोटरीद्वारे झाली आहेत. ही प्रकरणे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना सुरू केली. गुंठेवारी प्रकरणातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी केले. शुक्रवारी, दि. १२ याबाबत मनपा कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती.

चंद्रपूर शहरातील जी गुंठेवारी प्रकरणे आहेत त्यात व्यवहार हे नोटरीद्वारे केली आहेत. ज्या नागरिकांनी गुंठेवारी प्रकरणात नोटरीद्वारे व्यवहार केले त्यांना नियमित करण्याची संधी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजनेद्वारे मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजपत्रात अधिसूचित केलेल्या ७ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन आदेशाच्या अनुषंगाने महसूल व वनविभागाने ११ डिसेंबर रोजी परिपत्रक काढून योजनेबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना जारी केल्या आहेत.

१ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या वर्षामध्ये निष्पादित केलेल्या दस्तांमध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्यात येऊन व त्यावरील दंडाची रक्कम देखील संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे. यासंबंधी मनपा कार्यालयात मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांच्या अध्यक्षतेखालील सभेत विविध पैलूंवर चर्चा झाली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, सहायक संचालक, नगररचना सुनील दहिकर, सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अंकिता तांदुळे, भूमी अभिलेख उपअधीक्षक मिलिंद राऊत, सहायक दुय्यम निबंधक बी.एन.माहोरे, नरेंद्र बोके, सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते उपस्थित होते.

असे आहे योजनेचे स्वरूप

कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही १ लाखापेक्षा जास्त असलेल्या प्रकरणांत कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के सूट देऊन त्यावरील दंडाची संपूर्ण रक्कम माफ करण्यात आली आहे. १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत निष्पादित केलेल्या दस्तांच्या बाबतीत कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये २५ टक्क्यांपर्यंत सूट आणि दंड हा नाममात्र २५ लाख ते १ कोटी रुपये मर्यादेपर्यंतच वसूल करण्यात येणार आहे. दंडाची रक्क्म त्यापेक्षा जास्त असल्यास ती संपूर्णपणे माफ केली जाणार आहे.

अशी आहे अट

मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत दस्त हा कोणत्याही रकमेच्या मुद्रांक पेपरवर निष्पादित झालेला असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला अर्ज करता येणार नाही. यासंबंधी आढावा बैठकीत मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी विविध सूचना देऊन योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.