पुगलिया गटात ‘खुशी’ सोबत ‘गम’ही
By Admin | Updated: May 17, 2014 02:03 IST2014-05-17T00:05:43+5:302014-05-17T02:03:02+5:30
बल्लारपूर-चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून नरेश पुगलिया यांना तिकीट न देता ती संजय देवतळे यांना दिल्याने नाराज झालेल्या पुगलिया गटाला या निवडणुकीत संजय देवतळे हे पराभूत व्हावेत

पुगलिया गटात ‘खुशी’ सोबत ‘गम’ही
बल्लारपूर : बल्लारपूर-चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून नरेश पुगलिया यांना तिकीट न देता ती संजय देवतळे यांना दिल्याने नाराज झालेल्या पुगलिया गटाला या निवडणुकीत संजय देवतळे हे पराभूत व्हावेत, असे मनोमन वाटणे स्वाभाविक होते आणि नेमके तसेच घडले. याचा आनंद पुगलिया गटाला नक्की झाला असणार. सोबतच भाजपाच्या हंसराज अहीर यांनी देवतळे यांच्यापेक्षा सुमारे सव्वा दोन लाख मतांची आघाडी घेतली आहे. याचाही आनंद या गटाला मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत अहीर यांनी पुगलिया यांच्यापेक्षा केवळ ३२ हजार ४९५ मतांनी आघाडी घेतली होती. त्या तुलनेत या निवडणुकीत देवतळेंवर अहीर यांनी मोठय़ा मतांनी मागील आघाडीच्या सुमारे सातपट अधिक मते घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभूत झालेल्या पुगलिया यांना डावलून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हमखास निवडून येतील, या आत्मविश्वासाने संजय देवतळे यांना या निवडणुकीत उमेदवारी दिली होती. देवतळे हे पराभूत तर झालेच, तेही दोन लाखांहून अधिक फरकाने !
यामुळे, देवतळे यांना तिकीट देऊन काय साधले, असे पक्षश्रेष्ठींना विचारण्याची संधी यातून पुगलिया गटाला मिळाली आहे. ही आनंदाची, तर पुगलिया गटाने उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन
उल्लेखनीय असे की या १६ व्या लोकसभा निवडणुकीत हा गट प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच अलिप्त राहिला. या गटाच्या तीनदा बैठका झाल्या. वरिष्ठांना तीन-चारदा निवेदन देऊन झाले. त्यानंतर गटाने आपली कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती.
‘आप’च्या वामनराव चटप यांना मदत केल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे. चटप हे नक्कीच निवडून येतील, असे मतदानानंतर पुगलिया गटाकडून विश्वासाने सांगितले जात होते. चटप हे निवडून तर आले नाहीच, उलट ते तिसर्या स्थानावर फेकल्या गेलेत. याचे दु:खही या गटाला झाले आहे. एकंदरीत, या निकालाने पुगलिया गटाला ‘थोडी खुशी, थोडा गम’ अशी दुहेरी अनुभूती दिली आहे.