हरभरा पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:18+5:30
यावर्षी सुरुवातीला शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यानंतर परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके ऐन कापणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या संकटातून सावरुन शेतकऱ्यांनी उधार, उसणवारी करीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली.

हरभरा पीक धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील चार- पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादूर्भाव झाला असून शेतकरी यामुळे त्रस्त झाले आहे. सोयाबीन, कापसाचे उत्पादन हातचे गेल्यानंतर आता हरभर पिकही वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांना आहे.
यावर्षी सुरुवातीला शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यानंतर परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके ऐन कापणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.
या संकटातून सावरुन शेतकऱ्यांनी उधार, उसणवारी करीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली. जिल्ह्यात हरभरा पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र चार ते पाच दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके अशा हवामान बदलामुळे या पिकाला चांगलाच फटका बसत आहे. यामुळे रब्बी पिकही वाया जातो की, काय अशी भीती शेतकºयांना सतावत आहे.
निसर्गाची शेतकऱ्यांवर अवकृपा
यावर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशीच स्थिती राहील तर शेतकºयांनी जगायचे कसे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
अवकाळीनंतर हरभरा पिकावर भिस्त होती. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरही मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पीक धोक्यात आल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
- बंडूजी बोभाटे, शेतकरी गोवरी