शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

गोसीखुर्द उजवा कालव्याचे काम अर्धवट

By admin | Updated: August 27, 2016 00:37 IST

तळोधीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे.

पाण्याअभावी पिके संकटात : जनकापूर - पळसगाव येथील शेतकऱ्यांना फटकातळोधी (बा.): तळोधीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. या कालव्याचे काम करताना मोडतोड केल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे धान पीक पाण्याअभावी संकटात सापडले आहे. जवळपास ८० एकर क्षेत्राला याचा फटका बसत आहे. त्यामुळे या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केलेली आहे.मागील सात वर्षापूर्वी जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे करोडो रुपये खर्च करुन काम करण्यात आले. निधीअभावी या कालव्याचे काम मधेच सोडून देण्यात आले आहे. या भागातील शेतकऱ्यांना सिंचाई विभाग नागभीड अंतर्गत जनकापूर- येथील गट नं. ३४८ मामा तलावाचे निस्तार हक्कानुसार पाणी मिळत होते. मात्र गेल्या सात वर्षापासून गोसीखुर्द उजव्या कालव्याचा अर्धवट काम केल्यापासून सदर शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. मिंडाळा मंडळातील ८० एकरात पिकांची लागवड करून आपल्या पोटाची खडगी भरणारे शेतकरी दयाराम नान्हे, डुकरु नान्हे, हिरालाल शेंडे, पुरुषोत्तम गुरुनुले, आशीष गुरुनुले, सुरेश पाटील काशिवार, अरुण काशिवार, मानिक शेंडे, पुरुषोत्तम नवघडे, सोमेश्वर बावनघडे, महेश तोडासे, मारोती मोहुर्ले व अरविंद शेंडे या शेतकऱ्यांना निस्तार हक्कानुसार सदर तलावाचे पाणी लागू असताना सदर कालव्यामुळे पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. सदर शेतकऱ्यांनी गेल्या सात वर्षापासून स्थानिक आमदारांना या कल्पनेची माहिती देऊनसुद्धा ते शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आमदारांविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच या जनकापूर- पळसगाव गोसीखुर्द उजव्या कालव्यामध्ये पळसगाव येथील हिरालाल शेंडे यांची गट नं. ४६ ची शेतजमीन गेली आहे. मात्र त्यांना अद्यापही याचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यांना यासाठी शासन दरबारी पायपीट करावी लागत आहे.अगोदरच शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग कर्जापायी आत्महत्या करीत आहे. तरीही शासन व्यवस्थेकडून बळीराजाची थट्टा केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित शेतकऱ्यांना न्याय द्यावा व बळीराजाचे पीक वाचविण्यासाठी त्वरित पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)मागील सात वर्षापूर्वी जनकापूर - पळसाव गोसीखुर्द उजव्या कालव्याचे अर्धवट कामे करुन निस्तार हक्क असणाऱ्या जनकापूर सिंचाई मामा तलावाच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित केले आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. पीडित शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी कर्ज काढून उपाययोजना कराव्या लागत आहे. शासनाने मोडकळीस आलेला जनकापूर मामा तलावाचा कालवा (पाट) दुरुस्त करुन पाणी उपलब्ध करुन द्यावे. - अतुल सिद्धमशेट्टीवार, माजी तंटामुक्त अध्यक्ष