शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द उजवा कालव्याचे काम अर्धवट

By admin | Updated: August 27, 2016 00:37 IST

तळोधीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे.

पाण्याअभावी पिके संकटात : जनकापूर - पळसगाव येथील शेतकऱ्यांना फटकातळोधी (बा.): तळोधीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. या कालव्याचे काम करताना मोडतोड केल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे धान पीक पाण्याअभावी संकटात सापडले आहे. जवळपास ८० एकर क्षेत्राला याचा फटका बसत आहे. त्यामुळे या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केलेली आहे.मागील सात वर्षापूर्वी जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे करोडो रुपये खर्च करुन काम करण्यात आले. निधीअभावी या कालव्याचे काम मधेच सोडून देण्यात आले आहे. या भागातील शेतकऱ्यांना सिंचाई विभाग नागभीड अंतर्गत जनकापूर- येथील गट नं. ३४८ मामा तलावाचे निस्तार हक्कानुसार पाणी मिळत होते. मात्र गेल्या सात वर्षापासून गोसीखुर्द उजव्या कालव्याचा अर्धवट काम केल्यापासून सदर शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. मिंडाळा मंडळातील ८० एकरात पिकांची लागवड करून आपल्या पोटाची खडगी भरणारे शेतकरी दयाराम नान्हे, डुकरु नान्हे, हिरालाल शेंडे, पुरुषोत्तम गुरुनुले, आशीष गुरुनुले, सुरेश पाटील काशिवार, अरुण काशिवार, मानिक शेंडे, पुरुषोत्तम नवघडे, सोमेश्वर बावनघडे, महेश तोडासे, मारोती मोहुर्ले व अरविंद शेंडे या शेतकऱ्यांना निस्तार हक्कानुसार सदर तलावाचे पाणी लागू असताना सदर कालव्यामुळे पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. सदर शेतकऱ्यांनी गेल्या सात वर्षापासून स्थानिक आमदारांना या कल्पनेची माहिती देऊनसुद्धा ते शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आमदारांविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच या जनकापूर- पळसगाव गोसीखुर्द उजव्या कालव्यामध्ये पळसगाव येथील हिरालाल शेंडे यांची गट नं. ४६ ची शेतजमीन गेली आहे. मात्र त्यांना अद्यापही याचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यांना यासाठी शासन दरबारी पायपीट करावी लागत आहे.अगोदरच शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग कर्जापायी आत्महत्या करीत आहे. तरीही शासन व्यवस्थेकडून बळीराजाची थट्टा केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित शेतकऱ्यांना न्याय द्यावा व बळीराजाचे पीक वाचविण्यासाठी त्वरित पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)मागील सात वर्षापूर्वी जनकापूर - पळसाव गोसीखुर्द उजव्या कालव्याचे अर्धवट कामे करुन निस्तार हक्क असणाऱ्या जनकापूर सिंचाई मामा तलावाच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित केले आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. पीडित शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी कर्ज काढून उपाययोजना कराव्या लागत आहे. शासनाने मोडकळीस आलेला जनकापूर मामा तलावाचा कालवा (पाट) दुरुस्त करुन पाणी उपलब्ध करुन द्यावे. - अतुल सिद्धमशेट्टीवार, माजी तंटामुक्त अध्यक्ष