शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

१६ जूनपासून सुरू होणार गोंडवाना विद्यापीठाची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 5:00 AM

विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी कुलगुरूंनी १० सदस्यीय समन्वय समिती गठित केली होती. या समितीने धोरणात्मक निर्णय घेवून परीक्षा १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन, तीन, चार व पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचीच परीक्षा घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देवेळापत्रक जाहीर : नवीन शैक्षणिक वर्षे १ सप्टेंबरपासून सुरू करण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे गोंडवाना विद्यापीठाच्या रखडलेल्या पदविका, पदवीपूर्व व पदव्युत्तर अंतिम परीक्षा व त्यांच्या अनुशेष परीक्षा १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत घेण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लावण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्षे २०२०-२१ प्रथम वर्ष १ सप्टेंबर आणि इतर सर्व अभ्यासक्रमासाठी १ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी कुलगुरूंनी १० सदस्यीय समन्वय समिती गठित केली होती. या समितीने धोरणात्मक निर्णय घेवून परीक्षा १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन, तीन, चार व पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचीच परीक्षा घेतली जाणार आहे. उच्च शिक्षण संचालक पुणे यांच्या पत्रानुसार गोंडवाना विद्यापीठाने नियमित विद्यार्थ्यांची उन्हाळी सत्र २०२० ची परीक्षा घेण्यात येणार नसून विद्यार्थ्यांना ५० टक्के ग्रेड अंतर्गत मूल्यमापनावर व ५० टक्के गुण मागील सत्रातील परिक्षेच्या सरासरी गुणावरून ठरवल्या जाणार आहेत. तशा प्रकारच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.अंतर्गत मूल्यमापनाचे गुण हे विषयाचे निरंतर मूल्यमापन, सत्र पूर्वपरीक्षा व सत्रात परीक्षा या आधारावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाने घेतलेल्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका व निरंतर मूल्यमापनाच्या राबविलेल्या प्रक्रियेचे सर्व दस्तावेज सीलबंद करून जतन ठेवावे लागणार आहे. विद्यापीठाने मागणी केल्यानंतर सदर दस्तावेज विद्यापीठास द्यावे लागणार आहे. विद्यापीठाद्वारे दिलेले गुण एखाद्या विद्यार्थ्याला मान्य नसल्यास अशा विद्यार्थ्याला प्राप्त श्रेणीमध्ये सुधारणा करावयाची असल्यास हिवाळी २०२० परिक्षेमध्ये परीक्षा आवेदनपत्र भरून परीक्षा देता येईल. त्या परिक्षेत प्राप्त गुण अंतिम समजण्यात येईल, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी दिली.लॉकडाऊन कालावधी ‘उपस्थिती’ म्हणून ग्राह्यजे विद्यार्थी पुढील सत्राच्या प्रवेशापासून वंचित झाले असतील व शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये नियमित प्रवेश नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड पद्धतीने शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. ही सुविधा फक्त विद्यमान शैक्षणिक वर्षासाठीच आहे. ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा सर्वांकरिता लॉकडाऊन कालावधी हा उपस्थिती म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.१५ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीरविद्यापीठाद्वारे आयोजित परीक्षा विद्यापीठाच्या अभ्याक्रमावरच आधारीत राहील. आचार्य व एमफील विद्यार्थ्यांची मौखिक चाचणी परीक्षा व्हीडीओ कॉन्फन्सिंद्वारे होईल. आचार्य व एमफिल विद्यार्थ्यांना त्यांचे शोधप्रबंध, प्रबंधिका ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सादर करावा लागणार आहे. महाविद्यालय तात्पुरत्या स्वरूपात १५ जूनपासून सुरू होतील. सर्व उपक्रमांच्या पूर्वतयारीचा कालावधी ३० जूनपर्यंत असेल. पदविका, पदवीपूर्व व पदव्युत्तर अंतिम परीक्षा वगळून सर्व परिक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर होणार आहेत.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा