एलईडी बल्बच्या लाभापासून गोंडपिपरी तालुका वंचित
By Admin | Updated: December 25, 2015 00:31 IST2015-12-25T00:31:50+5:302015-12-25T00:31:50+5:30
राज्यातील विजेच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना विजेची बचत करता यावी, यासाठी स्वस्त दरात एलईडी बल्बचा पर्याय निवडण्यात आला.

एलईडी बल्बच्या लाभापासून गोंडपिपरी तालुका वंचित
आक्सापूर: राज्यातील विजेच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना विजेची बचत करता यावी, यासाठी स्वस्त दरात एलईडी बल्बचा पर्याय निवडण्यात आला. या बल्बमुळे ५० टक्क्यापेक्षा जास्त वीजेची बचत होत असल्यामुळे पंडीत दिनदयाल उपाध्याय जिवन ज्योती योजना आणण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गरीब, सर्वसामान्य नागरीकांना स्वस्त दरात एलईडी बल्ब पुरवठ्याचा प्रयत्न आहे. ही योजना जिल्ह्यातील अनेक तालुक्यापर्यंत पोहचली आहे. मात्र गोंडपिपरी तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी झालीच नसल्याने आणि याचा फायदा एकाही ग्राहकाला न मिळाल्यामुळे जनतेमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.
एकीकडे वीजेच्या वापरात वाढ होत असताना उत्पादनात घट होत आहे. याचा अतिरिक्त भार वीजेच्या जास्त बिलामुळे स्वरूपात सर्वसामान्य ग्राहकावर पडत आहे. विजेची बचत कमी व्हावी यासाठी शासनातर्फे अनेक योजनांच्या माध्यमातून सौर ऊर्जेवर चालणारे कित्येक साहित्य निर्माण केले आहे. पण हे सौर ऊर्जेवरील साहित्य महागडे व जास्त किंमतीचे असल्यामुळे त्याचा वापर मोजक्याच नागरिकानी घेतला. त्यानंतर यावर मात करण्यासाठी सीएफएल व एलईडी बल्ब बाजारात येवू लागले. परंतु ते महाग असल्यामुळे सर्वसामान्य नागरीक घेवू शकत नाही. त्यामुये यावर मात करुन सर्वसामान्य नागरीकांना देता येईल हा उद्देश ठेवून राज्य शासनाने पंडीत दिनदयाल उपाध्याय वीजन ज्योती योजना अंमलात आणली. शहरी व ग्रामीण भागातील लोकांना सात व्हॅटचे एलईडी बल्ब १०० रुपयोंमध्ये देण्याची योजना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून सुरु करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ही योजना शेवटच्या टप्प्यात चालू असली तरी मात्र गोंडपिपरी तालुक्यात पोहचलीच नसल्यामुळे या सुविधेपासून नागरीक वंचित आहे. वीजेचे बिल दर महिन्याला भरमसाठ येत आहेत. कमी वापर असतानाही जास्त बिलदिल्या जात असल्यामुळे वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कारभारावर नाराज आहेत. तरी ही योजना त्वरीत अंमलात आणून याचा लाभ गरीब सर्वसामान्य नागरीकांना मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)