शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:33 IST

महसूल प्रशासनात गावपातळीवर कोतवाल महत्वपूर्ण कणा आहे. राज्यातील कोतवालांना महसूल विभागात चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा. यासाठी त्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार पुढे केले. मात्र प्रशासनाने कोतवालांच्या न्याय मागणीची अद्याप दखल घेतली नाही.

ठळक मुद्देकाम बंद आंदोलन : तहसीलदारांना मागण्याचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : महसूल प्रशासनात गावपातळीवर कोतवाल महत्वपूर्ण कणा आहे. राज्यातील कोतवालांना महसूल विभागात चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा. यासाठी त्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार पुढे केले. मात्र प्रशासनाने कोतवालांच्या न्याय मागणीची अद्याप दखल घेतली नाही. आता आंदोलनाला तीव्र करण्यासाठी अन्न त्याग मार्गाचा अवलंब करण्याचा संकल्प केला. यासंदर्भात स्थानिक तहसीलदारांना निवेदन प्रदान अवगत करण्यात आले.राज्याच्या महसूल प्रशासनातील कोतवालांच्या राज्यव्यापी संघटनेने न्याय मागण्यासाठी अनेकदा आंदोलन केली. विधानमंडळावर मोर्चे काढले. उपोषण व साखळी उपोषण करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. आमदारांचे व मंत्र्यांच्या दाराचे उंबरठे झिजवले. परंतु कोतवालांना अद्याप न्याय मिळाला नाही. मतदानात प्रभावी संख्याबळ नसल्याने साऱ्यांनीच कोतवालांना वाऱ्यावर सोडले आहे. तरीही कधीतरी न्याय मिळेल, या आशेवर गावपातळीवरच्या कोतवालांचे आंदोलन मागील १५ दिवसांपासून जिल्हाभर सुरु आहे.महसूल प्रशासनातील महत्वाच्या घटकाला केवळ तुटपूंज्या मानधनावर सेवा बजवावी लागत आहे. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीचा ठरला आहे. शासन सेवेतील कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यात येऊन वारसांना निवृत्ती वेतन देण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली. कोतवालांना महसूल प्रशासनात शेतसारा गोळा करणे, नैसर्गिक आपत्ती दरम्यान वरिष्ठांना अहवाल देणे, कृषी गणना, संगणीकृत सातबारा, निवडणुकीत कामे कोतवालांच्या माध्यमातून केली जातात. मात्र त्यांच्या प्रलंबित न्याय मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे.इंग्रज राजवटीपासून कोतवालांची सेवाकोतवाल गावपातळीवरचा प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे. इंग्रजांच्या राजवटीपासून तो सेवा देत आहे. महसूल प्रशासनाचा तो कणा आहे. अन्य राज्यात कोतवालांना महसूल प्रशासनाने चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिला. लिपीक संवर्गात बढती मिळते. मात्र राज्य शासन अन्य राज्याच्या धर्तीवर राज्यातील कोतवालांना न्याय देत नाही. स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होऊनही तोडगा निघाला नाही.