शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:33 IST

महसूल प्रशासनात गावपातळीवर कोतवाल महत्वपूर्ण कणा आहे. राज्यातील कोतवालांना महसूल विभागात चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा. यासाठी त्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार पुढे केले. मात्र प्रशासनाने कोतवालांच्या न्याय मागणीची अद्याप दखल घेतली नाही.

ठळक मुद्देकाम बंद आंदोलन : तहसीलदारांना मागण्याचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : महसूल प्रशासनात गावपातळीवर कोतवाल महत्वपूर्ण कणा आहे. राज्यातील कोतवालांना महसूल विभागात चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा. यासाठी त्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार पुढे केले. मात्र प्रशासनाने कोतवालांच्या न्याय मागणीची अद्याप दखल घेतली नाही. आता आंदोलनाला तीव्र करण्यासाठी अन्न त्याग मार्गाचा अवलंब करण्याचा संकल्प केला. यासंदर्भात स्थानिक तहसीलदारांना निवेदन प्रदान अवगत करण्यात आले.राज्याच्या महसूल प्रशासनातील कोतवालांच्या राज्यव्यापी संघटनेने न्याय मागण्यासाठी अनेकदा आंदोलन केली. विधानमंडळावर मोर्चे काढले. उपोषण व साखळी उपोषण करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. आमदारांचे व मंत्र्यांच्या दाराचे उंबरठे झिजवले. परंतु कोतवालांना अद्याप न्याय मिळाला नाही. मतदानात प्रभावी संख्याबळ नसल्याने साऱ्यांनीच कोतवालांना वाऱ्यावर सोडले आहे. तरीही कधीतरी न्याय मिळेल, या आशेवर गावपातळीवरच्या कोतवालांचे आंदोलन मागील १५ दिवसांपासून जिल्हाभर सुरु आहे.महसूल प्रशासनातील महत्वाच्या घटकाला केवळ तुटपूंज्या मानधनावर सेवा बजवावी लागत आहे. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीचा ठरला आहे. शासन सेवेतील कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यात येऊन वारसांना निवृत्ती वेतन देण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली. कोतवालांना महसूल प्रशासनात शेतसारा गोळा करणे, नैसर्गिक आपत्ती दरम्यान वरिष्ठांना अहवाल देणे, कृषी गणना, संगणीकृत सातबारा, निवडणुकीत कामे कोतवालांच्या माध्यमातून केली जातात. मात्र त्यांच्या प्रलंबित न्याय मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे.इंग्रज राजवटीपासून कोतवालांची सेवाकोतवाल गावपातळीवरचा प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे. इंग्रजांच्या राजवटीपासून तो सेवा देत आहे. महसूल प्रशासनाचा तो कणा आहे. अन्य राज्यात कोतवालांना महसूल प्रशासनाने चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिला. लिपीक संवर्गात बढती मिळते. मात्र राज्य शासन अन्य राज्याच्या धर्तीवर राज्यातील कोतवालांना न्याय देत नाही. स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होऊनही तोडगा निघाला नाही.