शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
4
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
5
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
6
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
7
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
8
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
11
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
12
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

शेतकरी उत्पादित मालाला योग्य भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:32 PM

यावर्षी अपुऱ्या पावसाने शेती संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत शेती उत्पादक मालाला योग्य भाव मिळत नाही.

ठळक मुद्देआम आदमी पार्टी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यावर्षी अपुऱ्या पावसाने शेती संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत शेती उत्पादक मालाला योग्य भाव मिळत नाही. एकीकडे सोयाबीनचे तेल बाजारात ८० ते ९० रू किलोप्रमाणे विकल्या जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनला २५ ते ३० रुपये किलो भाव दिला जात आहे. सोयाबीनला पाच हजार रुपये कापसाला सात हजार रुपये व धानाला तीन हजार ५०० रूपये भाव देण्याच्या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.भाजपा विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत होती. आता भाजपा युतीचे शासन आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार, अशी अपेक्षा होती.पण सरकारकडून शेतकºयांविषयी ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या स्वामिनाथन आयोगाची सरकारद्वारे साधी चर्चा करण्यात येत नाही.चंद्रपूर जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीने मोठ्या प्रमाणात कापसाचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरीत नुकसानीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, तसेच बीटीकॉटन बियाणे कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, सर्व शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे विजबिल माफ करावे, अशा विविध मागण्यांचा समावेश निवेदनात होता.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात आम आदमी पार्टी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रभारी योगेश आपटे, बल्लारपूर-मूल प्रभारी सुनिल भोयर, संदीप पिंपळकर, भिवराज सोनी, अशोक आनंदे आदी उपस्थित होते.