शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

घोडाझरी उपकालव्याची किंमत 2 हजार 218 कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 5:00 AM

गोसेखुर्द प्रकल्पाच्या  घोडाझरी उपकालव्याला २३ जून  २००६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. काही दिवसातच कामही सुरू झाले. हा उपकालवा नागभीड तालुक्यातून भूमिगत स्वरूपात गेला आहे. त्यामुळे या कालव्याचा तालुक्याला फायदा काहीच नाही. उलटपक्षी या कालव्याच्या रूपाने मृत्यूचे दरवाजे आणि मातीचे ढिगारे तालुक्याच्या नशिबी आले आहेत. 

ठळक मुद्दे१२ वर्षांपासून काम सुरूच : पैसा खर्च होऊनही काम अपूर्णच, सिंचनाचा लाभ होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड :  तालुक्यातून गेलेल्या ५५ किमी लांबी असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याची किंमत २ हजार २१८ कोटीच्या घरात गेली आहे. काम कासव गतीने सुरू आहे. १२ वर्षांपासून या कालव्याचे काम सुरू असले तरी अद्यापही बरेच काम शिल्लक  आहे. काम पूणर्ण होऊन सिंचन सुविधा मिळेल, अशी आशा शेतकरी करीत आहेत.गोसेखुर्द प्रकल्पाच्या  घोडाझरी उपकालव्याला २३ जून  २००६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. काही दिवसातच कामही सुरू झाले. हा उपकालवा नागभीड तालुक्यातून भूमिगत स्वरूपात गेला आहे. त्यामुळे या कालव्याचा तालुक्याला फायदा काहीच नाही. उलटपक्षी या कालव्याच्या रूपाने मृत्यूचे दरवाजे आणि मातीचे ढिगारे तालुक्याच्या नशिबी आले आहेत. नागभीड तालुक्यातून घोडाझरी उपकालवा गेला आहे. १२ वर्षांपूर्वी या उपकालव्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र आजही काम अर्धवटच आहे. तालुक्यातील पान्होळी, मेंढा, किरमिटी, नवेगाव पांडव, कोदेपार येथून हा कालवा गेला असून, कालव्यातून निघालेल्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकठिकाणी मातीचे डोंगर तयार करण्यात आले आहेत. शेतात मातीचे डोंगर तयार झाल्याने शेकडो एकर जमीन नापिकी झाली आहे. एवढेच नव्हे तर या अर्धवट कालव्याच्या रूपाने शासनाने तालुक्यातील लोकांसाठी मृत्यूचे दरवाजे उघडून दिले आहेत, अशी जनभावना होत आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत तालुक्यातील नवेगाव पांडव येथे ५ आणि मौशी येथे ३ अशा ८  घटनांनी हेच आधोरेखित झाले आहे. असे असले तरी फायदा मात्र झालाच नाही.

३५ वर्षांनंतरही गोसेखुर्द धरणाकडून उपेक्षाब्रह्मपुरी : तालुक्यातील एकमेव गोसेखुर्द  धरण आहे. १९८२ ला या धरणाची पायाभरणी करण्यात आली. उजवा कालवा ब्रह्मपुरी तालुक्यातून ४० कि.मी.चा गेला आहे. परंतु हा कालवा अजूनही शेतकऱ्यांसाठी उपेक्षित ठरला आहे.   आजघडीला शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा ठरला आहे. या प्रकल्पाची किंमत सुरुवातीला १७२ कोटी रुपये होती. आता त्याची किंमत १९ हजार कोटींच्यावर गेली आहे. अजूनही मुख्य कालव्याचे उपकालवे कागदावरच आहेत. त्यासाठी पुन्हा किती वर्षे लागतील, हे न सुटणारे कोडे आहे. तालुक्यातील ९० टक्के गावे या धरणामुळे सुजलाम सुफलाम होणार, असे स्वप्न शेतकरी बाळगून आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या धरणाची पाहणी केली. तरीही कामाला गती मिळाली नाही. 

१० वर्षांपासून रखडला लालनाला प्रकल्पचिमूर : वर्धा जिल्ह्यातील कोरा येथून येणाऱ्या लाल नाल्याचे पाणी चिमूर तालुक्यातील आमडी, रेंगाबोडी, बोथली, भिवकुंड या गावांतील शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी मागील दहा वर्षांपूर्वी लालनाला प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. मात्र, निधीअभावी हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पाचे कोरा ते आमडीपर्यंत पाईपलाईनचे काम झाले आहे. त्यांनतर या प्रकल्पाला निधी उपलब्ध न झाल्याने हे काम बंद पडले. या प्रकल्पात जाणाऱ्या शेतीला दर कमी मिळाल्याच्या कारणाने काही शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला होता. आ. बंटी भांगडिया यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून योग्य मोबदला देण्यासाठी हालचाली केल्या आहेत. शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली परिसरातील शेतकऱ्यांची आहे.

कळमना-आमडी उपसा सिंचनाचे काम रखडलेबल्लारपूर : तालुक्यातील बामणी, दहेली, दुधोली, कळमना, आमडी, कोरटीमता, पळसगाव, कवळजाई इत्यादी भागातील शेतीला वरदान ठरणार असलेले वर्धा नदी वरील कळमना-आमडी उपसा सिंचनाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, विद्युतचे काम पूर्ण न झाल्याने ते कार्यान्वित होऊ शकले नाही. सुमारे ४० कोटी रूपयांचा हा प्रकल्प बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीवर कळमना गावाजवळ उभा करण्यात आला आहे. या प्रकल्पातून शेतीला पाणी शेतामधून पाईप लाईनही टाकलेल्या आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी याचे काम तत्कालीन अर्थमंत्री व बल्लारपूरचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या प्रकल्पाचे काम वेगाने झाले. मात्र, विद्युुुुतचे काम अजून पूर्ण न झाल्यामुळे ते कार्यान्वित होऊ शकलेे नाही. या प्रकल्पातून शेतीला  कधी पाणी मिळणार याची प्रतीक्षा या भागातील शेतकऱ्यांना आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा फायदा शेतीसाठी होणार आहे. 

 

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरणGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प