शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

शिक्षकाविना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

By admin | Updated: July 9, 2014 23:22 IST

बालकांचा हक्क, शिक्षणाचा अधिकार २००९ अन्वये वर्ग १ ते वर्ग ५ वी पूर्व प्राथमिक, वर्ग ६ ते ८ उच्च प्राथमिक, वर्ग ९, १० पूर्व माध्यमिक आणि वर्ग ११ ते १२ उच्च माध्यमिक अशा प्रकारचा शैक्षणिक

तळोधी (बा.) : बालकांचा हक्क, शिक्षणाचा अधिकार २००९ अन्वये वर्ग १ ते वर्ग ५ वी पूर्व प्राथमिक, वर्ग ६ ते ८ उच्च प्राथमिक, वर्ग ९, १० पूर्व माध्यमिक आणि वर्ग ११ ते १२ उच्च माध्यमिक अशा प्रकारचा शैक्षणिक पॅटर्न राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. यानुसार अनेक शाळांना वर्ग पाचवा जोडला आहे. मात्र शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.नव्या नियमानुसार सत्र २०१४-१५ मध्ये ज्या शाळात वर्ग ४ थीपर्यंतचे वर्ग होते व जिथे वर्ग ५ वा आणि वर्ग ७ वा सुरु होता, तिथे वर्ग ८ वा वर्ग सुरु करण्याचे शासन आदेश निर्गमित झाले. त्यानुसार ग्रामीण भागातील काही शाळांत वर्ग ५ वा व वर्ग ८ वा सुरु झाला. परंतु हायस्कूल मध्ये असलेला वर्ग ५ वा बंद करण्याचे आदेश शासनाकडून निर्गमीत न झाल्याने यापूर्वी ज्या शाळांत वर्ग ५ वा सुरु होता, तो वर्ग पूर्ववत सुरु ठेवण्यासाठी तेथील शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वर्ग टिकविण्याचा प्रयत्न केला या कामात काही अंशी त्यांना यशही प्राप्त झालेले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील ज्या जि.प. शाळांत ४ था वर्ग होता, तिथे आज ५ वा वर्ग व दोन शिक्षक अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यापैकी एखादा शिक्षक रजेवर किंवा प्रशिक्षण घेण्याकरिता गेला तर एकच शिक्षक आणि ५ वर्ग अशी अवस्था निर्माण होणार आहे. मग एक शिक्षक ५ वर्गांना कशाप्रकारे सांभाळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार बालकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासकीय नियोजनाअभावी प्राथमिक शिक्षणाचा बट्याबोळ झाला असून शिक्षणाच्या अधिकाराच्या नियमाची एैसीएैसी होत असल्याचे दिसून येत आहे. जि.प. शाळांमध्ये शिक्षक नसल्याने असे चित्र उभे झाले आहेत तर खासगी शाळात वर्ग ५ वीमध्ये पुरेशे विद्यार्थी न मिळाल्याने वर्गातील पटसंख्या कमी आहे किंवा पूर्वीच्या वर्गाची संख्या कमी झाली आहे. परिणामी बरेचसे शिक्षक कमी होत आहे. शासनाकडून कुठलेही नियोजन न करता वर्ग ४ थी असलेल्या शाळांना वर्ग ५ वा का जोडला, हे न समजनारे कोडेच आहे.आता वर्ग ५ वी सुरु झाल्याने ग्रामीण भागातील शाळांना नवीन शिक्षक मिळवून देण्याकरिता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परंतु तोपर्यंत शाळेचे अर्धे किंवा संपूर्ण सत्र तर संपून जाणार नाही ना, असा प्रश्न पालकांना पडला आहे. (वार्ताहर)