शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
4
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
5
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
6
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
7
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
8
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
9
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
10
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
11
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
12
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
13
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
14
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
15
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
16
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
17
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
18
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
19
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
20
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाविना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

By admin | Updated: July 9, 2014 23:22 IST

बालकांचा हक्क, शिक्षणाचा अधिकार २००९ अन्वये वर्ग १ ते वर्ग ५ वी पूर्व प्राथमिक, वर्ग ६ ते ८ उच्च प्राथमिक, वर्ग ९, १० पूर्व माध्यमिक आणि वर्ग ११ ते १२ उच्च माध्यमिक अशा प्रकारचा शैक्षणिक

तळोधी (बा.) : बालकांचा हक्क, शिक्षणाचा अधिकार २००९ अन्वये वर्ग १ ते वर्ग ५ वी पूर्व प्राथमिक, वर्ग ६ ते ८ उच्च प्राथमिक, वर्ग ९, १० पूर्व माध्यमिक आणि वर्ग ११ ते १२ उच्च माध्यमिक अशा प्रकारचा शैक्षणिक पॅटर्न राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. यानुसार अनेक शाळांना वर्ग पाचवा जोडला आहे. मात्र शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.नव्या नियमानुसार सत्र २०१४-१५ मध्ये ज्या शाळात वर्ग ४ थीपर्यंतचे वर्ग होते व जिथे वर्ग ५ वा आणि वर्ग ७ वा सुरु होता, तिथे वर्ग ८ वा वर्ग सुरु करण्याचे शासन आदेश निर्गमित झाले. त्यानुसार ग्रामीण भागातील काही शाळांत वर्ग ५ वा व वर्ग ८ वा सुरु झाला. परंतु हायस्कूल मध्ये असलेला वर्ग ५ वा बंद करण्याचे आदेश शासनाकडून निर्गमीत न झाल्याने यापूर्वी ज्या शाळांत वर्ग ५ वा सुरु होता, तो वर्ग पूर्ववत सुरु ठेवण्यासाठी तेथील शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वर्ग टिकविण्याचा प्रयत्न केला या कामात काही अंशी त्यांना यशही प्राप्त झालेले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील ज्या जि.प. शाळांत ४ था वर्ग होता, तिथे आज ५ वा वर्ग व दोन शिक्षक अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यापैकी एखादा शिक्षक रजेवर किंवा प्रशिक्षण घेण्याकरिता गेला तर एकच शिक्षक आणि ५ वर्ग अशी अवस्था निर्माण होणार आहे. मग एक शिक्षक ५ वर्गांना कशाप्रकारे सांभाळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार बालकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासकीय नियोजनाअभावी प्राथमिक शिक्षणाचा बट्याबोळ झाला असून शिक्षणाच्या अधिकाराच्या नियमाची एैसीएैसी होत असल्याचे दिसून येत आहे. जि.प. शाळांमध्ये शिक्षक नसल्याने असे चित्र उभे झाले आहेत तर खासगी शाळात वर्ग ५ वीमध्ये पुरेशे विद्यार्थी न मिळाल्याने वर्गातील पटसंख्या कमी आहे किंवा पूर्वीच्या वर्गाची संख्या कमी झाली आहे. परिणामी बरेचसे शिक्षक कमी होत आहे. शासनाकडून कुठलेही नियोजन न करता वर्ग ४ थी असलेल्या शाळांना वर्ग ५ वा का जोडला, हे न समजनारे कोडेच आहे.आता वर्ग ५ वी सुरु झाल्याने ग्रामीण भागातील शाळांना नवीन शिक्षक मिळवून देण्याकरिता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परंतु तोपर्यंत शाळेचे अर्धे किंवा संपूर्ण सत्र तर संपून जाणार नाही ना, असा प्रश्न पालकांना पडला आहे. (वार्ताहर)