शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

भविष्यात गोवरी-सास्ती गावाला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:38 PM

शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नाल्याला पाणी आले. मात्र पुढे नाल्याचा प्रवाह वेकोलिने माती टाकून अडविल्याने गोवरी वसाहतीपासून - बाबापूर गावाकडे जाण्याºया रस्त्यावरील नाल्याला एकाच दिवसाच्या पाण्याने पुराचे स्वरूप आले होते.

ठळक मुद्देएका दिवसाच्या पावसाने नाला फुल्ल : मातीच्या ढिगाऱ्याने अडला पाण्याचा प्रवाह

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नाल्याला पाणी आले. मात्र पुढे नाल्याचा प्रवाह वेकोलिने माती टाकून अडविल्याने गोवरी वसाहतीपासून - बाबापूर गावाकडे जाण्याºया रस्त्यावरील नाल्याला एकाच दिवसाच्या पाण्याने पुराचे स्वरूप आले होते. त्यामुळे पावसाळ्यात गोवरी- सास्ती गावाला पुराचा धोका असल्याचे दिसून येते. वेकोलिने तत्काळ उपाययोजना केली नाही तर वेकोलि परिसरातील गावांना यावर्षी पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.राजुरा तालुक्यातील कोळसा खाणीची मुजोरी वेकोलि परिसरातील गावांचे प्रचंड नुकसान करणारी आहे. गोवरी, सास्ती पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहे. कोळसा उत्खननासाठी वेकोलि प्रशासनाने मातीचे महाकाय ढिगारे नदी, नाल्याच्या काठावर टाकले आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास गोवरी परिसरात चांगलाच पाऊस बरसला. त्यामुळे गोवरी गावाजवळून वाहणाºया नाल्याला पाणी आले. मात्र वेकोलिने यावर्षी नाल्याच्या अगदी काठावर मातीचे ढिगारे टाकल्याने नाल्याचे नैसर्गिक पात्र पूर्णत: अरुंद झाले आहे.काही ठिकाणी नाल्याचा प्रवाहच अडल्याने नाल्यातून समोर पाणी निघण्याचे मार्गच बंद झाले. त्यामुळे रात्रीच्या सुमारास आलेल्या पावसाने पूर्ण नालाच पाण्याने हाऊसफूल्ल झाला. त्यामुळे पूरस्थितीसारखी परिस्थिती उदभवली होती. एका दिवसाच्या पावसाने नाल्याची ही परिस्थिती होत असेल तर पावसाळ्यात वेकोलि परिसरातील गावांचे काय होणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नाला पाण्याने भरला, यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र वेकोलिने जिवंत नैसर्गिक नाल्यावरच कुरघोडी केल्याने व मातीचे ढिगारे नाल्याच्या काठावर टाकल्याने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली. यासाठी वेकोलिचे अधिकारी जबाबदार असून वेकोलिला नैसर्गिक नाल्याच्या पात्रात माती टाकून नाला वळविण्याचा अधिकार दिला कुणी, असा प्रश्न निसर्ग प्रेमी पर्यावरण संघटनेकडून विचारला जात आहे. भविष्यात पुराचा मोठा धोका टाळण्यासाठी वेकोलिने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. नाहीतर यावर्षी गोवरी- सास्ती गावासह परिसरातील गावांना पुराचा मोठा धोका होण्याची शक्यता आहे. यासाठी वकोलिच्या जबाबदार अधिकाºयांनी याकडे जाणीवपूर्णक लक्ष देणे गरजेचे आहे.