शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळावरून मालगाडीचे डबे घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST

तब्बल पाच तास क्रेनच्या मदतीने रेल्वे गॅगमेन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून घसरलेले डब्बे (रेल्वे वॅगन) रुळावर आणले. त्यानंतर रात्री ११ वाजता तेलंगणाकडे जाणारा मुख्य रेल्वे मार्ग सुरु झाला. ही मालगाडी अंबुजा सिमेंट कंपनीमधून सिमेंट भरून बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून जळगावकडे जाण्यास सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निघाली होती. परंतु जवळच असलेल्या गोल पुलाजवळील पॉर्इंटवर मालगाडीचे तीन डब्बे रुळावरून घसरले.

ठळक मुद्देबल्लारपूर स्थानकावरील घटना : पाच तासानंतर रेल्वे मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे यार्डमधील प्लॅटफार्म नं.३ वरून जळगावकडे निघालेली सिमेंट भरलेली मालगाडी गोल पुलाजवळ अचानक रेल्वे रुळावरून घसरली. या घटनेमुळे रेल्वे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.तब्बल पाच तास क्रेनच्या मदतीने रेल्वे गॅगमेन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून घसरलेले डब्बे (रेल्वे वॅगन) रुळावर आणले. त्यानंतर रात्री ११ वाजता तेलंगणाकडे जाणारा मुख्य रेल्वे मार्ग सुरु झाला. ही मालगाडी अंबुजा सिमेंट कंपनीमधून सिमेंट भरून बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून जळगावकडे जाण्यास सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निघाली होती. परंतु जवळच असलेल्या गोल पुलाजवळील पॉर्इंटवर मालगाडीचे तीन डब्बे रुळावरून घसरले. घटनेची माहिती तांत्रिक विभागाने तत्काळ नागपूर डीआरएम मुख्यालयास कळवली. नागपूर येथील रेल्वे विभागाचे सहायक डीआरएम सतपती, स्टेशन मास्टर रामलाल सिंग, येथील विभागीय सहायक अभियंता एन.ए.नागदेवे यांच्या देखरेखीखाली वर्धेवरून आलेल्या क्रेनच्या मदतीने रेल्वे गँगमन यांनी रेल्वे वॅगन बाजूला करण्यात यश मिळविले व डब्बे यार्डमध्ये उभे करण्यात आले. मात्र यासाठी तब्बल पाच तासांचा कालावधी लागला. येथील रेल्वे डीआरयूसीसीचे सदस्य जयकरणसिंग बजगोती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.मोठा अनर्थ टळलाघटनेच्या वेळी मुसळधार पाऊस सुरु होता. ही घटना नेमकी गोल पुलाच्यावर घडली. मालगाडीचे डब्बे पुलाखाली कोसळले असते तर मोठा अनर्थ घडला असता. कारण गोलपुलाखालील रस्त्यावर नेहमीच वर्दळ सुरू असते. कोरोना संकटामुळे सध्या बल्लारपूर स्थानकावर दिल्ली व आंध्रप्रदेशकडून येणाºया-जाणाºया रेल्वे गाड्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे गाड्या खोळंबल्या नाही.

टॅग्स :railwayरेल्वे