लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे यार्डमधील प्लॅटफार्म नं.३ वरून जळगावकडे निघालेली सिमेंट भरलेली मालगाडी गोल पुलाजवळ अचानक रेल्वे रुळावरून घसरली. या घटनेमुळे रेल्वे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.तब्बल पाच तास क्रेनच्या मदतीने रेल्वे गॅगमेन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून घसरलेले डब्बे (रेल्वे वॅगन) रुळावर आणले. त्यानंतर रात्री ११ वाजता तेलंगणाकडे जाणारा मुख्य रेल्वे मार्ग सुरु झाला. ही मालगाडी अंबुजा सिमेंट कंपनीमधून सिमेंट भरून बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून जळगावकडे जाण्यास सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निघाली होती. परंतु जवळच असलेल्या गोल पुलाजवळील पॉर्इंटवर मालगाडीचे तीन डब्बे रुळावरून घसरले. घटनेची माहिती तांत्रिक विभागाने तत्काळ नागपूर डीआरएम मुख्यालयास कळवली. नागपूर येथील रेल्वे विभागाचे सहायक डीआरएम सतपती, स्टेशन मास्टर रामलाल सिंग, येथील विभागीय सहायक अभियंता एन.ए.नागदेवे यांच्या देखरेखीखाली वर्धेवरून आलेल्या क्रेनच्या मदतीने रेल्वे गँगमन यांनी रेल्वे वॅगन बाजूला करण्यात यश मिळविले व डब्बे यार्डमध्ये उभे करण्यात आले. मात्र यासाठी तब्बल पाच तासांचा कालावधी लागला. येथील रेल्वे डीआरयूसीसीचे सदस्य जयकरणसिंग बजगोती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.मोठा अनर्थ टळलाघटनेच्या वेळी मुसळधार पाऊस सुरु होता. ही घटना नेमकी गोल पुलाच्यावर घडली. मालगाडीचे डब्बे पुलाखाली कोसळले असते तर मोठा अनर्थ घडला असता. कारण गोलपुलाखालील रस्त्यावर नेहमीच वर्दळ सुरू असते. कोरोना संकटामुळे सध्या बल्लारपूर स्थानकावर दिल्ली व आंध्रप्रदेशकडून येणाºया-जाणाºया रेल्वे गाड्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे गाड्या खोळंबल्या नाही.
रेल्वे रुळावरून मालगाडीचे डबे घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST
तब्बल पाच तास क्रेनच्या मदतीने रेल्वे गॅगमेन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून घसरलेले डब्बे (रेल्वे वॅगन) रुळावर आणले. त्यानंतर रात्री ११ वाजता तेलंगणाकडे जाणारा मुख्य रेल्वे मार्ग सुरु झाला. ही मालगाडी अंबुजा सिमेंट कंपनीमधून सिमेंट भरून बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून जळगावकडे जाण्यास सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निघाली होती. परंतु जवळच असलेल्या गोल पुलाजवळील पॉर्इंटवर मालगाडीचे तीन डब्बे रुळावरून घसरले.
रेल्वे रुळावरून मालगाडीचे डबे घसरले
ठळक मुद्देबल्लारपूर स्थानकावरील घटना : पाच तासानंतर रेल्वे मार्ग मोकळा