शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

'खनिज निधी दीर्घकालीन जलपुनर्रभरणासाठीच वापरा' माजी खासदार नरेश पुगलिया यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 14:13 IST

नरेश पुगलिया यांची मागणी: वेकोलिच्या खाणींमुळे इरई व झरपट नद्यांचे अस्तित्व धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूरकर व परिसरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन इरई तसेच झरपट नदीचे अस्तित्व टिकावे म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. यावर लवकरच अंतिम सुनावणी होईल. मात्र, प्रशासनाने जिल्हा खनिज विकासचा वापर अन्यत्र नव्हे, तर या दोन नद्यांच्या जलपुनर्रभरणासाठीच करावा, अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरुवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केली.

खासदार पुगलिया यांनी इरई व झरपट नदीच्या अस्तित्वासाठी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोणती निरीक्षणे नोंदविली. महानगर पालिका, जिल्हा प्रशासन व वेकोलिला कोणते दिशानिर्देशन दिले, याबाबतची तपशीलवार माहिती दिली. पुगलिया म्हणाले, वेकोलिवगळता आतापर्यंत मनपा व जिल्हा प्रशासनाने चुका मान्य करून प्रतिबंधात्मक पाऊल उचलले. मात्र, वेकोलिचा आडमुठेपणा दूर झाला नाही. वेकोलिकडून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा दिला जातो. याचा अर्थ नागरिकांना प्रदूषणाच्या खाईत ढकलायचे आणि इरई व झरपट नद्यांचे अस्तित्व संपवायचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वेकोलिने बंद कोळसा खाणींबाबत प्रतिबंधात्मक पाऊल उचलले नाही. वर्धा व्हॅली परिसरात खनिज विकास निधीतून तीन बंधारे बांधावे, वर्धा व्हॅली परिसरात तीन बंधारे बांधावे, जिल्हा प्रशासनानेही खनिज विकास निधी किरकोळ कामांसाठी खर्च करण्याऐवजी जलधोरण व पर्यावरणाच्या पायाभूत दीर्घकालीन कामांसाठीच वापरावा. यासाठी जिल्हा प्रशासनाने व पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी माजी खासदार पुगलिया यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक अशोक नागपुरे, देवेंद्र बेले उपस्थित होते. 

वेकोलिने मागितला खनिज निधीचा हिशेबसीएलएल निधीसोबतच स्वामित्व व जिल्हा खनिज निधीच्या आधी डरई व झरपट नदीला प्रदूष णमुक्त करण्यासाठी मोठा निधी दिल्याचा दावा वेकोलिच्या वकिलाने न्यायालयात केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या शपथपत्रानुसार, प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या प्रतिबं धात्मक खर्चासंदर्भात चार आठवड्यांत विस्तृत अहवाल द्यावा. वेकोलिने दिलेल्या योगदानाचा व किती निधी, कोणत्या कारणांसाठी वापरला, याची माहिती देण्याचा आदेश न्यायमूर्ती न्यायमूर्ती भारती डांगरे व अभय मंत्री यांनी दिला.

२० ऑक्टोबरला उच्च न्यायालयात सुनावणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अॅड. एस. भांडारकर यांच्या वतीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सुनावणी झाली. त्यावेळी सत्यशोधन समितीचा अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातील दोन मुद्द्यांवर न्यायालयाने प्रकाश टाकला. झरपट व इरई नदी प्रदूषणाचा निकाली काढण्यासाठी वर्धा नदीत पाणी पंप लावणे अव्यवहार्य असल्याचे सांगितले. तेव्हा दीर्घकालीन व आठ अल्पकालीन उपाययोजना अंमलात का आणल्या नाही, याबाबतही ताशेरे ओढले. येत्या २० ऑक्टो. २०२४ रोजी न्यायमूर्ती भारती डांगरे व अभय मंत्री या द्विसदस्यीय बेंचमध्ये सुनावणी होणार आहे. त्यानंतर अंतिम सुनावणी होईल. दोनही नद्या वाचविणे व लोकांच्या हितासाठी आपला लढा सुरूच राहील, असेही माजी खासदार पुगलिया यांनी सांगितले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर