शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

अतिक्रमित वनजमिनीवर चालला वनविभागाचा बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:01 IST

चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी शेकडो वर्षांपासून राहत असलेला आदिवासी बांधव अतिक्रमित वनजमीन कसून कुंटुबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी वनजमिनीवर धान, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची लागवड केली आहे. मात्र वनविभागाने मदनापूर, तुकूम येथील अतिक्रमित आदिवासी शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता वनजमिनीवर २९ जूनला बुलडोजर चालविला.

ठळक मुद्देशेतमालाचे नुकसान करून सपाटीकरण : आदिवासी शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ बु : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मदनापूर, तुकूम येथील बफर व कोर झोन क्षेत्रातील शेकडो आदिवासी शेतकरी बांधवाच्या वडिलोपार्जित अतिक्रमित वनजमिनी आहेत. वनविभागाने या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता यापैकी फक्त ११ आदिवासी शेतकरी बांधवाच्या अतिक्रमित वनजमिनीवर बुलडोजर चालवून सपाटीकरण केले.चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी शेकडो वर्षांपासून राहत असलेला आदिवासी बांधव अतिक्रमित वनजमीन कसून कुंटुबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी वनजमिनीवर धान, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची लागवड केली आहे. मात्र वनविभागाने मदनापूर, तुकूम येथील अतिक्रमित आदिवासी शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता वनजमिनीवर २९ जूनला बुलडोजर चालविला. त्यामुळे आदिवासी शेतकरऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आदिवासी जाती जमाती व इतर पारंपरिक वनहक्क अधिनियम २००६ व २००८ नुसार सदर अतिक्रमित जागेवर वनहक्क दावा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे प्रलंबित आहे. वनविभागाने या जागेवर झाडे लावण्याच्या दृष्टीकोनातून खड्डे खोदून वनजमिनीचे सपाटीकरण केले आहे. या मोहिमेमुळे प्रत्येक आदिवासी शेतकऱ्यांचे अडीच लाख रुपये नुकसान झाले आहे. सदर अतिक्रमित वनजमिनीची मौका चौकशी करून नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी कैलास कूळमेथे, रूपचंद मडावी, शत्रुघ्न बगडे, पांडुरंग बावणे, वसंता नन्नावरे, पत्रु रंदये, प्रमोद पेंदाम, संजय भरडे, प्रल्हाद खाटे, सलेवान हाजेम, मनोहर जुमनाके यांनी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, सदर मोहीम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आल्याचे वनपाल एम.जे. मस्के यांनी सांगितले.शेतकरी भयभीतमासळ बु. परिसरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या व पळसगाव बफर वन परिक्षेत्रालगत असलेल्या पिपर्डा, पळसगाव, गोंडमोहाळी, विहीरगाव, विहीरगाव तुकुम, मदनापूर, बामनगाव, कोलारा येथील शेतकरीदेखील जबरानजोत वनहक्कांच्या नियमानुसार वनजमिनीवर पिके घेतात. तिथेदेखील वनविभागाचा बुलडोजर चालू शकतो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागEnchroachmentअतिक्रमण