तब्बल दोन लाख लोकांपर्यंत पोहचला भोजनरथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:47+5:30

संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या महामारीने हाहाकार माजविला आहे. जगासह भारतातही या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जात आहे. देशासह चंद्रपुरातही संचाबंदीचे पालन केल्या जात आहे. आज संचाबंदीचा १८ वा दिवस आहे. या दिवसांमध्ये चंद्रपूरकरांनी मोठा संयम पाळत प्रशासनाला सहकार्य करत संचारबंदी यशस्वी केली आहे.

Food reached nearly two million people | तब्बल दोन लाख लोकांपर्यंत पोहचला भोजनरथ

तब्बल दोन लाख लोकांपर्यंत पोहचला भोजनरथ

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना दिलासा : किशोर जोरगेवार यांचा कौतुकास्पद उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात नागरिकांना अनेक अचडणीचा सामना करावा लागत आहे. अशात गरजुंच्या मदतीसाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार समोर आले असून त्यांच्या यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संचारबंदीच्या काळात गरजुंसाठी भोजन वितरित केल्या जात आहे. दिवसाला जवळपास १२ ते १५ हजार गरजू लोकांपर्यंत आमदार किशोर जोरगेवार यांचा भोजनरथ पोहचत असून संचारबंदीपासून आजपर्यंत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने जवळपास दोन लाख लोकांपर्यंत भोजन पोहचविण्यात आले आहे. त्यांची ही सेवा निरंतर सुरु असून यात समाजिक संस्थांचेही त्यांना योगदान लाभत आहे.
संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या महामारीने हाहाकार माजविला आहे. जगासह भारतातही या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जात आहे. देशासह चंद्रपुरातही संचाबंदीचे पालन केल्या जात आहे. आज संचाबंदीचा १८ वा दिवस आहे. या दिवसांमध्ये चंद्रपूरकरांनी मोठा संयम पाळत प्रशासनाला सहकार्य करत संचारबंदी यशस्वी केली आहे. असे असले तरी संचाबंदीच्या काळात सर्व उद्योग, नवनिर्मीतीचे काम बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्यांपुढे मोठया अडचणी निर्माण झाल्या आहे. अशात आमदार किशोर जोरगेवार यांनी संचारबंदीच्या पहिल्या दिवशीपासून गरजुंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
त्यांच्या वतीने शहर व ग्रामीण भागातील गरजुंसाठी भोजनसेवा सूरु करण्यात आली आहे. सुरुवातीला ३ ते ४ हजार गरजुंपासून सुरु झालेली ही भोजनसेवा आता वाढत्या गरजेनूसार विस्तारित करण्यात आली असून आजघडीला दिवसाला १२ ते १५ हजार गरजू लोकांपर्यंत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने भोजन पोहचविले जात आहे. यात शहरातील विविध समाजिक संस्थांचे सहकार्यही आमदार जोरगेवार यांना मिळत आहे.

शहरात सहा केंद्र
प्रत्येक गरजूपर्यंत भोजन पोहचण्यासाठी स्वत: आ. जोरगेवार हे नियोजन करीत आहेत. भोजन वाटपासाठी शहरातील मुख्य भागांमध्ये सहा प्रमूख केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रावरुन प्रत्येक वार्डातील शाखा प्रमुखांकडे भोजन पाकीट दिल्या जात असून त्यांच्या मार्फत ते गरजुंपर्यत पोहचवले जात आहे.

Web Title: Food reached nearly two million people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न