विरुरात आग : पाच घरे भस्मसात

By Admin | Updated: May 29, 2014 02:05 IST2014-05-29T02:05:19+5:302014-05-29T02:05:19+5:30

आज बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शॉकसर्किटने आग लागून चार घरे जळून खाक झाली.

Fire without: Fire five houses | विरुरात आग : पाच घरे भस्मसात

विरुरात आग : पाच घरे भस्मसात

विरुर(स्टे.): आज बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शॉकसर्किटने आग लागून चार घरे जळून खाक झाली. यात एकूण २0 लाखांचे नुकसान झाल्याचे समजते.

वारलु देवाजी नारनवरे, विनोद देवाजी नारनवरे, आनंदराव नारनवरे, राहुल भगवान झाडे, बंडू खंडू झाडे अशी घरे जळाल्यांची नागरिकांची नावे आहेत. त्यांना एकही उपयोगी वस्तू बाहेर काढता आलीे नाही. येथील आठवडी बाजार असल्याने आज दुपारच्या सुमारास घरातील मंडळी बाजार करण्यासाठी गेली होती. अचानक शॉटसर्किटमुळे प्रथम वारलु देवाजी नारनवरे यांच्या घराला आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बाजुला असलेले विनोद नारनवरे, आनंदराव नारनवरे, राहुल झाडे, बंडू झाडे यांच्या घरालाही आगीने कवेत घेतले.

बहुतांश गावकरीही आठवडी बाजारात असल्याने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. या आगीत पाचही घरातील सामान जळून खाक झाले. जनावरांचे वैरणसुद्धा जळून खाक झाल्याने पाचही जणांचे फारच नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच राजुर्‍यातून अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले. या घटनेमुळे वारलु देवाजी नारनवरे, विनोद देवाजी नारनवरे, आनंदराव नारनवरे, राहुल भगवान झाडे, बंडू खंडू झाडे यांचा संसार उघड्यावर आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Fire without: Fire five houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.