शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

रेल्वे बोगद्याखालून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:31 PM

तालुक्यातील चिखली ते कन्हाळगाव दरम्यान रेल्वे बोगद्यांमध्ये अंधार राहत असल्याने नागरिकांना त्याखालून प्रवास करताना अडचणी येतात. गावांकडे जाण्यासाठी अन्य मार्ग नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील चिखली ते कन्हाळगाव दरम्यान रेल्वे बोगद्यांमध्ये अंधार राहत असल्याने नागरिकांना त्याखालून प्रवास करताना अडचणी येतात. गावांकडे जाण्यासाठी अन्य मार्ग नाही.चिखलीपासून पूर्वेला ताडभुज, कन्हाळगाव मंदिर तर भसबोरन नावाचा मोठा तलाव व परिसरात शेती आहे. चिखली येथील नागरिक जनावरे चराईसाठी कन्हाळगाव जंगलात नेत असतात. कन्हाळगाव हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. बाहेरगावातील अनेक भाविक मंदिराकडे याच रस्त्याने जातात. याच रस्त्यावर गोंदिया-बल्लारपूर हा रेल्वे मार्ग आहे. काही वर्षांपूवी रेल्वे रूळावरूनच नागरिकांना दळणवळणाचा मार्ग होता. मात्र या रूळावर अनेक अपघात झाले. त्यामुळे सन २०१५ मध्ये रेल्वे प्रशासनाने अपघात कमी करण्यासाठी हा मार्ग बंद केला. त्यावर लाखो रूपये खर्च करून रेल्वे रूळाखाली सिमेंट काँक्रीटचा बोगदा तयार केला. परंतु संबंधित कंत्राटदारांने निकषांचे पालन केले नाही.अपघाताचा धोका रेल्वे बोगद्यात दिवसदेखील अंधार असतो. पावसाळ्यात जोराचा पाणी आल्यास बोगद्यात चार ते पाच फुट पाणी साचून राहते. परिणामी गावाकडे जाण्याचा मार्गच बंद होतो. बोगद्यातून जात असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.सर्वेक्षण करावेचंद्रपूर-गोंदिया मार्गावरील रेल्वे रूळाच्या बाजूला शेकडो शेतकऱ्यांच्या शेती आहेत. रेल्वे प्रशासनाने अनेक ठिकाणी पूल बांधल्याने शेतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. पुलांखाली बोगदे तयार करण्यात आले. त्यांचे सर्वेक्षण करून उपाययोजनेची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वे