शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
2
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
3
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
4
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
5
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
7
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
8
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
9
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
10
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
11
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
13
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
15
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
16
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
17
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
18
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
19
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
20
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

आर्थिक कोंडी असताना शेतकऱ्यांना मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 5:00 AM

वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोजा शेतकºयांना सोसावा लागत आहे. त्यातच मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त्याचा मजुरांची नितांत गरज पडते. पुरुष व स्त्री मजूर गावात मिळेनासे झाल्याने त्याला इतर गावातून मजूर आणण्यासाठी वाहनाचा खर्चही भरावा लागतो.

ठळक मुद्देशेतीचा हंगाम : ऐन पेरणीच्या वेळी पैशाची चणचण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन तसेच दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे सध्या शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच आता पावसाळी सुरू झाल्यामुळे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, मजुरांना मजुरी देताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.यावर्षी बियाणे, खते, कीटकनाशकाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धानाचे बियाण्याचे भाव हजारोंच्या घरात आहे. धान तसेच कपाशीच्या अनेक प्रकारच्या प्रजाती पाहून शेतकरी सुद्धा भांबावले आहेत. याही परिस्थितीत वाढीव भावाने बियाण व खते घेऊन शेतकरी आपली शेती करण्यास पुढे आला आहे.वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यातच मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त्याचा मजुरांची नितांत गरज पडते. पुरुष व स्त्री मजूर गावात मिळेनासे झाल्याने त्याला इतर गावातून मजूर आणण्यासाठी वाहनाचा खर्चही भरावा लागतो. मजुरी वाढ व बियाणे, खते, औषधे यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढत मात्र शेतकऱ्यांच्या मालाला शासन व व्यापारी योग्य भाव देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. सध्या पेरणीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांनी मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र पिकविलेला मालच विकला नसल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.अनेकांनी धरला शेतीचा मार्गकाही दिवसापूर्वी शेतीला मोठे महत्त्व होते. मात्र मध्यंतरी नोकरीला महत्त्व आले. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आणि बहुतांश तरुणांनी गावाचा रस्ता धरला. त्यामुळे सध्या शेतीला पूर्वीसारखेच महत्त्व प्राप्त होत आहे. मात्र पिकविलेल्या मालाला योग्य भाव तसेच बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मागील काही वर्षांपासून शेती करणे कठीण झाले आहे. पिकविलेल्या मालाला योग्य भाग मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा ताण पडत आहे. त्यातच आता लॉकडाऊमुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने मदत करणे गरजेचे आहे.- संभाशिव जुनगरी,शेतकरी, गोवरी

टॅग्स :Farmerशेतकरी