शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पिकासाठी रात्रभर जागतात शेतकरी

By admin | Updated: November 8, 2014 01:00 IST

शेतकऱ्याचे संपूर्ण पीक घरात येईपर्यंत चांगले पिक झाले, असे विश्वासाने सांगता येणे सद्यस्थितीत कठीण झाले आहे.

सास्ती : शेतकऱ्याचे संपूर्ण पीक घरात येईपर्यंत चांगले पिक झाले, असे विश्वासाने सांगता येणे सद्यस्थितीत कठीण झाले आहे. शेतकरी दादा कुण्या ना कुण्या संकटात सापडून त्याचे सर्व बाजूने नुकसानच होताना दिसून येत आहे. कधी जास्त पाऊस आल्याने तर कधी कमी पाऊस आल्याने नुकसान, कधी लष्करी अळी तर कधी गारपीट, याव्यतिरिक्त आता शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे झाले आहे. शेतातील उभे पीक तर सोडाच पण कापणी करुन ठेवलेल्या पिकावरसुद्धा रानटी जनावरांनी हल्ला चढवून नुकसान करणे सुरू केले आहे. त्यामुळे पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांला थंडीतही अख्खी रात्र जागून काढावी लागत आहे.कृषिप्रधान देशातील शेतकरी कायमच संकटात सापडलेला दिसून येत आहे. यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी अहोरात्र काबाडकष्ट करुन उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु निसर्गाच्या प्रकोपापुढे त्याचे काहीच चालत नाही. कुण्या ना कुण्या कारणाने त्याला अपयशच येत असते. शासनही शेतकऱ्यांसाठी बऱ्याच सोईसुविधा उपलब्ध करुन देते. परंतु त्याचाही फायदा होत नाही. शेतकरी दादा नेहमीच संकटात सापडून हवालदील झालेला असतो.पिकाच्या पेरणीपासूनच त्याला संकटाला समोरे जावे लागते. मशागतीनंतर पावसाअभावी पेरण्या खोळंबतात. कशाबशा पेरण्या झाल्या की पाऊस बेपत्ता झाल्याने दुबार पेरणीचे संकट येते. पेरणी झालीच तर मोठा पाऊस होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. या सर्व संकटातून सावरतो न सावरतो तोच लष्करी अळी किंवा इतर रोगांमुळे नुकसान सुरु होते. हे सर्व झाल्यावर अकाली पाऊस, गारपीट याची भीती असते. याव्यतिरिक्त परिसरातील प्रदूषणामुळे शेतीचे नुकसान होते. या सर्व संकटातून पिकाचे रक्षण करता करता शेतकरी पूर्णत: खचून जातो. परंतु त्याचे संकट काही संपल्या संपत नाही. या सर्व संकटानंतर येणारे संकट म्हणजे रानटी जनावरांचा धुमाकूळ. उभ्या पिकावर हल्ला करुन पिकाचे नुकसान केले जात आहे. पिकांची कापणी करुन शेतात ठेवलेल्या पिकावरही हल्ला सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी दादा कडाक्याच्या थंडीतही आपल्या शेतातील पिकांचे रक्षण करण्याकरिता अख्खी रात्र जागून काढत आहे.जंगल क्षेत्र लागून असलेल्या शेतात जर जीव धोक्यात घालून रक्षण करावे लागते. पिकाच्या रक्षणासाठी शेतात थंडीत अख्खी रात्र जागावी लागते. जंगली जनावरे अन्न व पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेऊन शेतात असलेल्या पिकावर हल्ला करुन आपले पोट भरण्यापेक्षा नुकसान जास्त करीत आहे. कापून ठेवलेल्या धानाच्या गंजीवर हल्ला करुन नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मात्र प्रशासन लक्ष देत नाही. जनावरांच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसुद्धा मिळत नाही. किंवा यावर नियंत्रण म्हणून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, हे विशेष. (वार्ताहर)