शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

पिकासाठी रात्रभर जागतात शेतकरी

By admin | Updated: November 8, 2014 01:00 IST

शेतकऱ्याचे संपूर्ण पीक घरात येईपर्यंत चांगले पिक झाले, असे विश्वासाने सांगता येणे सद्यस्थितीत कठीण झाले आहे.

सास्ती : शेतकऱ्याचे संपूर्ण पीक घरात येईपर्यंत चांगले पिक झाले, असे विश्वासाने सांगता येणे सद्यस्थितीत कठीण झाले आहे. शेतकरी दादा कुण्या ना कुण्या संकटात सापडून त्याचे सर्व बाजूने नुकसानच होताना दिसून येत आहे. कधी जास्त पाऊस आल्याने तर कधी कमी पाऊस आल्याने नुकसान, कधी लष्करी अळी तर कधी गारपीट, याव्यतिरिक्त आता शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे झाले आहे. शेतातील उभे पीक तर सोडाच पण कापणी करुन ठेवलेल्या पिकावरसुद्धा रानटी जनावरांनी हल्ला चढवून नुकसान करणे सुरू केले आहे. त्यामुळे पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांला थंडीतही अख्खी रात्र जागून काढावी लागत आहे.कृषिप्रधान देशातील शेतकरी कायमच संकटात सापडलेला दिसून येत आहे. यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी अहोरात्र काबाडकष्ट करुन उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु निसर्गाच्या प्रकोपापुढे त्याचे काहीच चालत नाही. कुण्या ना कुण्या कारणाने त्याला अपयशच येत असते. शासनही शेतकऱ्यांसाठी बऱ्याच सोईसुविधा उपलब्ध करुन देते. परंतु त्याचाही फायदा होत नाही. शेतकरी दादा नेहमीच संकटात सापडून हवालदील झालेला असतो.पिकाच्या पेरणीपासूनच त्याला संकटाला समोरे जावे लागते. मशागतीनंतर पावसाअभावी पेरण्या खोळंबतात. कशाबशा पेरण्या झाल्या की पाऊस बेपत्ता झाल्याने दुबार पेरणीचे संकट येते. पेरणी झालीच तर मोठा पाऊस होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. या सर्व संकटातून सावरतो न सावरतो तोच लष्करी अळी किंवा इतर रोगांमुळे नुकसान सुरु होते. हे सर्व झाल्यावर अकाली पाऊस, गारपीट याची भीती असते. याव्यतिरिक्त परिसरातील प्रदूषणामुळे शेतीचे नुकसान होते. या सर्व संकटातून पिकाचे रक्षण करता करता शेतकरी पूर्णत: खचून जातो. परंतु त्याचे संकट काही संपल्या संपत नाही. या सर्व संकटानंतर येणारे संकट म्हणजे रानटी जनावरांचा धुमाकूळ. उभ्या पिकावर हल्ला करुन पिकाचे नुकसान केले जात आहे. पिकांची कापणी करुन शेतात ठेवलेल्या पिकावरही हल्ला सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी दादा कडाक्याच्या थंडीतही आपल्या शेतातील पिकांचे रक्षण करण्याकरिता अख्खी रात्र जागून काढत आहे.जंगल क्षेत्र लागून असलेल्या शेतात जर जीव धोक्यात घालून रक्षण करावे लागते. पिकाच्या रक्षणासाठी शेतात थंडीत अख्खी रात्र जागावी लागते. जंगली जनावरे अन्न व पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेऊन शेतात असलेल्या पिकावर हल्ला करुन आपले पोट भरण्यापेक्षा नुकसान जास्त करीत आहे. कापून ठेवलेल्या धानाच्या गंजीवर हल्ला करुन नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मात्र प्रशासन लक्ष देत नाही. जनावरांच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसुद्धा मिळत नाही. किंवा यावर नियंत्रण म्हणून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, हे विशेष. (वार्ताहर)