अतिरिक्त बिलामुळे शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: May 25, 2014 23:27 IST2014-05-25T23:27:51+5:302014-05-25T23:27:51+5:30
या ना त्या कारणामुळे सतत संकटात असलेल्या शेतकर्यांवर आता वीज वितरण कंपनीच्या अनागोंधी कारभारामुळे नवीन आर्थिक संकट घोंघावत आहे. वाजवीपेक्षा जास्त वीज बिल देण्यात येत असल्याने

अतिरिक्त बिलामुळे शेतकरी त्रस्त
ंलखमापूर : या ना त्या कारणामुळे सतत संकटात असलेल्या शेतकर्यांवर आता वीज वितरण कंपनीच्या अनागोंधी कारभारामुळे नवीन आर्थिक संकट घोंघावत आहे. वाजवीपेक्षा जास्त वीज बिल देण्यात येत असल्याने शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरी विहिर, बोअरवेल, नदी नाल्यांवर बसविलेल्या वीज मोटारच्या माध्यमातून शेतात सिंचन करतात. उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात शेतकरी पाण्याचा कमी वापर करतात. वापर कमी असल्याने त्या प्रमाणात वीज बिल येणे अपेक्षित आहे. मात्र शेतकर्यांना अतिरिक्त बील देवून वीज वितरण कंपनी शेतकर्यांची आर्थिक लुट करीत असल्याचा आरोप कोरपना तालुक्यातील सिंचन करणार्या शेतकर्यांनी केला आहे. रिडिंगप्रमाणे बिल पाठवले जात नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. कोरपना तालुक्यातील अनेक शेतकरी बोअरवेल व विहिरीतून पाण्याचा उपसा करून सिंचन करतात. मात्र वीज बिलाच्या वाढीव दरामुळे व अतिरिक्त बील वाढ होवून येत असल्याने उत्पादन खर्चाचा विचार करता शेतकर्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. यातच काही ठिकाणी शेतामध्ये पोल खचलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे वीज पुरवठा बंद आहे. याबाबत शेतकर्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयांना विनंती अर्ज केले. मात्र त्याची कोणीही दखल घेत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. वीज कनेक्शनसाठी वारंवार वीज वितरन कंपनीच्या कार्यालयात जावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तालुक्यात गडचांदूर, कोरपना आणि पारडी येथे स्वतंत्र वीज पुरवठा केंद्र आहे. मात्र शेतकर्यांना सेवा देताना कुचराई केली जात आहे. कंपनीच्या ठराविक वाढीव दरानुसार बिल पाठवणे अपेक्षित असताना जळालेल्या युनिट पेक्षाही अधिक युनिटचे बील पाठविले जात आहे. वीज कनेक्शन बंद असताना व तसे सदर कार्यालयाला अर्जाद्वारे कळविले असतानाही ३ महिन्याचे बिल २ हजार ५00 ते ३ हजार रुपयापर्यंत पाठविण्यात येत आहे. याबाबत अधिकार्यांना विचारना केली असता योग्य उत्तर देण्यात येत नसल्याचेही शेतकर्यांचे म्हणणे आहे. वीज वितरण कंपनी शेतकर्यांची आर्थिक लूट करीत असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)