लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : रासायनिक खतांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. असे असले तरी काही शेतकरी याला अपवाद आहेत. नागभीड येथील अरूण नरूले हे त्यापैकीच एक. मागील सहा वर्षांपासून सेंद्रीय शेतीचा प्रयोग करून त्यांनी आपली शेती विषमुक्त केली आहे.मागील सहा वर्षांपासून त्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे सुरु केले आहे. या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत धानाचे उत्पादन घेतले. आहे. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी पूर्णपणे शेंद्रीय पद्धतीचा वापर केल्याने त्यांनी उत्पादित केलेले तांदूळ हातोहात विकला जात आहे. नवीन काहीतरी करायचे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकर जागेवर लिंबू, शेवगा, आंबा व आवळ्याची लागवड केली आहे. तर एक एकर जागेवर कारले, वांगी, टमाटर, चवळी, ढेमसा आदी भाजीपाल्याचे पीक घेतले. भाजीपाल्याच्या पिकाचे त्यांचे हे पहिले वर्ष असल्याने पाहिजे तसे उत्पन्न आले नाही. त्याचबरोबर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठही उपलब्ध झाली नाही. याही परिस्थितीत लागवड आणि खुरपणी खर्च वजा जाता ८ हजार रुपए महिना प्राप्त झाला. याशिवाय घरी विषमूक्त भाजीपाल्याचा वापर झाला. सोशल मिडियाच्या माध्यमातून नरूले यांच्या विषमुक्त भाजीपाला उत्पादनाची माहिती परिसरात झाल्याने अनेककजण त्यांच्या घरी जाऊन भाजीपाला विकत घेत आहेत. नरूले यांनी यावर्षी २ एकरामध्ये मुंगाचे उत्पादन घेतले. या दोन एकरात त्यांना १४ क्विंटल मूग झाले. यासाठीही रासायनिक खताचा वापर टाळला.
नागभीड येथील शेतकऱ्याने सुरू केली विषमुक्त शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST
मागील सहा वर्षांपासून त्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे सुरु केले आहे. या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत धानाचे उत्पादन घेतले. आहे. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी पूर्णपणे शेंद्रीय पद्धतीचा वापर केल्याने त्यांनी उत्पादित केलेले तांदूळ हातोहात विकला जात आहे. नवीन काहीतरी करायचे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकर जागेवर लिंबू, शेवगा, आंबा व आवळ्याची लागवड केली आहे.
नागभीड येथील शेतकऱ्याने सुरू केली विषमुक्त शेती
ठळक मुद्देसहा वर्षांपासून प्रयोग : पिकविलेला शेतमाल हातोहाल विकला जातो