शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या मालकी हक्कांसाठी शेतकऱ्याची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:21 IST

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावांतील नागरिकांना महाराष्ट्र सरकारकडून जमिनीचा सातबारा देण्यात आला.

ठळक मुद्दे१४ गावांची व्यथा : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गावे शासकीय योजनांपासून वंचित

आॅनलाईन लोकमतजीवती : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावांतील नागरिकांना महाराष्ट्र सरकारकडून जमिनीचा सातबारा देण्यात आला. पण त्यावर जमीन कसणाऱ्याचे नाव आणि मालकी हक्काची नोंद केली नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची वेळ शेकडो शेतकऱ्यांवर आली आहे. पाठपुरावा करूनही राज्य शासनाने दखल न घेतल्याने आजही फरपट सुरूच असल्याचे दिसून येते.जीवती तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वस्ती करून जीवन जगणाऱ्या मुकादमगुडा, परमडोली, तांडा, कोटा (बु), लेंडीजाळा, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, येसापूर, पळसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा या गावांतील शेकडो शेतकºयांना १४ फेब्रुवारी १९९६ मध्ये जमिनीचा सातबारा देण्यात आला आहे. पण, त्यातील भोगवटदार रकान्यात ‘सरकार’ अशी नोंद करण्यात आली आहे. शिवाय, नमूना वाटामध्ये केवळ जमीन कसणाºयाचे नाव आहे. भोगवटदार रकान्यात ‘सरकार’ अशी नोंद असल्यामुळे ती जमीन शेतकºयांची नसून कायद्यानुसार सरकारची मानली जाते. त्यामुळे या सातबाराचा १४ गावांतील शेतकºयांना शेतीच्या विकासासाठी कुठलाही फायदा घेता नाही. शेतकºयांना शेतीविषयक दस्ताऐवज देण्यास संबंधित तलाठी नकार देतात.१९६२-६३ पासून वास्तव्यास असलेल्या येथील शेतकरी मराठी भाषिक आहेत. १९९५ पासून चंद्रपूर लोकसभा आणि राजुरा विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत आहेत. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशातील सार्वत्रिक निवडणुकांवर सहाव्यांदा बहिष्कार टाकला होता. मात्र, महाराष्ट्र सरकार या उपेक्षित १४ गावांना आपले मानून न्याय देण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही नेमके कोणत्या राज्यात आहोत, असा संतप्त प्रश्न अन्यायग्रस्त शेतकºयांनी केला आहे.इच्छाशक्ती हवीमहाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये अडकलेल्या १४ गावांचा वाद सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढला. १७ जुलै १९९७ ला दिलेल्या आदेशानुसार ही गावे महाराष्ट्र राज्याच्या ताब्यात आली आहेत. त्यामुळे सरकारने तेथील सर्व जनतेला संविधानाच्या तरतुदीनुसार सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. परंतु, लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती कमी पडत असल्याने या गावांवर अन्यायाची मालिका सुरू आहे.सांत्वनेला अर्थ नाहीनिवडणुकीपूर्वी गावात भेट देऊन शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली जाते. मात्र, निकाल घोषित होताच पाच वर्षे कुणीही व्यथा समजून घेत नाही. नेत्यांकडून केवळ निवडणुकीच्या हंगामातच कोरडी सांत्वना मिळते. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे खोटी आश्वासने न देता जमिनीचा भूमिअभिलेख तयार करून सर्व शेतकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे द्यावी.- रामदास रणविर, सामाजिक कार्यकर्ते मुकादमगुडा