शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यातून वर्षाला १२ लाखाचे उत्पन्न मिळवत शेतकरी कुटुंबाने साधली समृद्धी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:54 IST

यशकथा : परिस्थितीने हतबल होत सुरुवातीला एकरभर शेतीत भाजीपाल्याचे उत्पादनास सुरुवात केली.

- घनश्याम नवघडे ( चंद्रपूर ) 

निसर्गाच्या अवकृपेमुळे हताश न होता, काही शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत इतर पिके घेऊन शेती व्यवसाय कसा फायदेशीर आहे, याचा प्रत्यय आणून देतात. चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव, ता. नागभीड येथील दिनेश पाथोडे यांनी असेच उदाहरण इतर शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. त्यांच्या अख्ख्या कुटुंबानेच शेतीला वाहून घेतले आहे.

शेतीतून ते वर्षाकाठी दहा ते बारा लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावत असून, यामुळे त्यांचे कुटुंब समृद्ध झाले आहे.दिनेश यांची गावालगतच वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. या शेतीत वर्षभर भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊन परिसरातील शेतकऱ्यांसाठी ते मैलाचा दगड ठरले आहेत. दिनेशचे वडील शंकर पाथोडे यांचा मूळचा टेलरिंगचा व्यवसाय. या व्यवसायात त्यांची कशीबशी गुजराण सुरू होती. अशातच गावातील एका शेतकऱ्याने शंकररावांना भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा सल्ला दिला.

परिस्थितीने हतबल असलेल्या शंकररावांनी हा सल्ला मनावर घेतला आणि आपल्या एकरभर शेतीत ते भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले. वर्ष, दोन वर्षांनंतर यात त्यांना बऱ्यापैकी पैसा दिसू लागल्याने टेलरिंगचा व्यवसाय सोडून त्यांनी मग शेतीवरच लक्ष केंद्रित केले. वर्षभरात ते विविध भाजीपाल्यांची पिके घेऊ लागले. घरी असलेली दीड एकर शेती त्यांना कमी पडू लागली. मग त्यांनी शेतीला लागून असलेली सभोवतालची सहा-सात एकर शेतजमीन याच नफ्यातून हळूहळू खरेदी केली. आता या सर्व शेतीत ते वर्षभर भाजीपाल्याची लागवड करीत आहेत.

आता दिनेश यांनीेही नोकरीच्या मागे न लागता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून व शेतीलाच व्यवसाय मानून स्वत:ला पूर्णपणे वाहून घेतले आहे. दिनेशचे वडील शंकरराव, पत्नी आणि आई अगदी सकाळपासूनच शेतामध्येच असतात. एवढेच नाही तर गावातील सात-आठ महिलांना वर्षभर पाथोडे यांच्या शेतीच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होत आहे. आज जो नागभीडला भाजीपाला उपलब्ध होत आहे, त्यातला निम्मा वाटा पाथोडे यांचा आहे. एवढेच नाही तर वांगी, कारले, टोमॅटो, कोबी, कोहळा, पपई, लौकी यासारखे भाजीपाल्याचे वाण ते नागपूरला निर्यातही करीत आहेत. भाजीपाला निर्यातीसाठी त्यांनी स्वत:ची वाहनेही घेतला.

तीन एकरांत शतावरीत्यांनी तीन एकर जागेत शतावरी या वनौषधीची लागवड केली आहे. शतावरीचा हा प्रयोग या तालुक्यात तरी नवीन आहे. पाथोडे यांनी शेतात आठ ठिकाणी विंधन व दोन ठिकाणी विहिरी खोदल्या आहेत. भाजीपाल्यांसोबत त्यांनी यावर्षी पपईचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. शतावरी या वनौषधीचा त्यांनी शेतात प्रथमच प्रयोग केला आहे. नफा दिसला तर शतावरीसोबतच इतरही वनौषधींचे उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. अतिशय बेताची परिस्थिती असूनही पाथोडे केवळ आपल्या मेहनतीने परिस्थितीवर स्वार झाले आहेत. शेतीच्या क्षेत्रात पाथोडे कुटुंब संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी