शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
3
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
4
अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
5
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
6
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
7
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
8
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
9
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
10
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
11
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
12
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
13
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
14
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
15
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
16
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
17
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
18
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

भाजीपाल्यातून वर्षाला १२ लाखाचे उत्पन्न मिळवत शेतकरी कुटुंबाने साधली समृद्धी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:54 IST

यशकथा : परिस्थितीने हतबल होत सुरुवातीला एकरभर शेतीत भाजीपाल्याचे उत्पादनास सुरुवात केली.

- घनश्याम नवघडे ( चंद्रपूर ) 

निसर्गाच्या अवकृपेमुळे हताश न होता, काही शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत इतर पिके घेऊन शेती व्यवसाय कसा फायदेशीर आहे, याचा प्रत्यय आणून देतात. चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव, ता. नागभीड येथील दिनेश पाथोडे यांनी असेच उदाहरण इतर शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. त्यांच्या अख्ख्या कुटुंबानेच शेतीला वाहून घेतले आहे.

शेतीतून ते वर्षाकाठी दहा ते बारा लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावत असून, यामुळे त्यांचे कुटुंब समृद्ध झाले आहे.दिनेश यांची गावालगतच वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. या शेतीत वर्षभर भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊन परिसरातील शेतकऱ्यांसाठी ते मैलाचा दगड ठरले आहेत. दिनेशचे वडील शंकर पाथोडे यांचा मूळचा टेलरिंगचा व्यवसाय. या व्यवसायात त्यांची कशीबशी गुजराण सुरू होती. अशातच गावातील एका शेतकऱ्याने शंकररावांना भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा सल्ला दिला.

परिस्थितीने हतबल असलेल्या शंकररावांनी हा सल्ला मनावर घेतला आणि आपल्या एकरभर शेतीत ते भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले. वर्ष, दोन वर्षांनंतर यात त्यांना बऱ्यापैकी पैसा दिसू लागल्याने टेलरिंगचा व्यवसाय सोडून त्यांनी मग शेतीवरच लक्ष केंद्रित केले. वर्षभरात ते विविध भाजीपाल्यांची पिके घेऊ लागले. घरी असलेली दीड एकर शेती त्यांना कमी पडू लागली. मग त्यांनी शेतीला लागून असलेली सभोवतालची सहा-सात एकर शेतजमीन याच नफ्यातून हळूहळू खरेदी केली. आता या सर्व शेतीत ते वर्षभर भाजीपाल्याची लागवड करीत आहेत.

आता दिनेश यांनीेही नोकरीच्या मागे न लागता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून व शेतीलाच व्यवसाय मानून स्वत:ला पूर्णपणे वाहून घेतले आहे. दिनेशचे वडील शंकरराव, पत्नी आणि आई अगदी सकाळपासूनच शेतामध्येच असतात. एवढेच नाही तर गावातील सात-आठ महिलांना वर्षभर पाथोडे यांच्या शेतीच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होत आहे. आज जो नागभीडला भाजीपाला उपलब्ध होत आहे, त्यातला निम्मा वाटा पाथोडे यांचा आहे. एवढेच नाही तर वांगी, कारले, टोमॅटो, कोबी, कोहळा, पपई, लौकी यासारखे भाजीपाल्याचे वाण ते नागपूरला निर्यातही करीत आहेत. भाजीपाला निर्यातीसाठी त्यांनी स्वत:ची वाहनेही घेतला.

तीन एकरांत शतावरीत्यांनी तीन एकर जागेत शतावरी या वनौषधीची लागवड केली आहे. शतावरीचा हा प्रयोग या तालुक्यात तरी नवीन आहे. पाथोडे यांनी शेतात आठ ठिकाणी विंधन व दोन ठिकाणी विहिरी खोदल्या आहेत. भाजीपाल्यांसोबत त्यांनी यावर्षी पपईचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. शतावरी या वनौषधीचा त्यांनी शेतात प्रथमच प्रयोग केला आहे. नफा दिसला तर शतावरीसोबतच इतरही वनौषधींचे उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. अतिशय बेताची परिस्थिती असूनही पाथोडे केवळ आपल्या मेहनतीने परिस्थितीवर स्वार झाले आहेत. शेतीच्या क्षेत्रात पाथोडे कुटुंब संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी