शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 22:43 IST

गतवर्षी सोयाबीनला दहा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. नंतर कमी होऊन तो पहिले आठ व नंतर सहा हजार रुपयांवर स्थिरावला होता. मात्र सोयाबीनचा हंगाम सुरू होताच दरात घसरण सुरू झाल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे शेतमालाच्या भाव वाढवण्याची मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सोयाबीनच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. नवे सोयाबीन बाजारात येताच व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहे. क्विंटलमागे हजार रुपयांची घसरण झाली आहे. मागील महिन्यात पाच ते सहा हजारांवर असलेला सोयाबीनचा भाव आता चार ते साडेचार हजारांवर आलेला आहे. त्यामुळे सोयाबीनची दरवाढ झाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. अन्यथा यंदा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.यंदा दोन-अडीच महिन्यांपासून सतत पाऊस सुरू आहे. किमान दीड ते दोन लाख हेक्टरवील सोयाबीनचे नुकसान झाल्याने उत्पादनात कमी येणार आहे. काढणीच्या हंगामातही मध्ये-मध्ये पाऊस सुरू आहे. सोयाबीनच्या गंज्या पावसाने भिजत आहेत. गतवर्षी सोयाबीनला दहा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. नंतर कमी होऊन तो पहिले आठ व नंतर सहा हजार रुपयांवर स्थिरावला होता. मात्र सोयाबीनचा हंगाम सुरू होताच दरात घसरण सुरू झाल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे शेतमालाच्या भाव वाढवण्याची मागणी होत आहे.

सोयाबीनवर केलेला खर्चही निघेनायंदा पावसाने वेळी अवेळी हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. उताराही कमी झाला आहे. सोयाबीन वरील खर्चही निघणार की नाही,अशी भीती आहे.

मूग, उडदाची आवक निरंकजिल्ह्यातील मूग व उडदाचे पीक उशिराच्या पावसाअभावी बाद झाले आहे. यामध्ये जे पीक बचावले,ते अतिवृष्टीमुळे खराब झाले असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये मूग व उडदाची आवक निरंक असल्याचे दिसून येते.

पावसामुळे सोयाबीनचे भाव घसरलेनव्या सोयाबीनमध्ये अधिक आर्द्रता असल्याने दरात कमी आलेली आहे. जुन्या सोयाबीनचे दर मात्र पाच हजारांच्यावर आहे. याशिवाय पावसाने भिजलेले सोयाबीनचे दर २२०० पासून सुरू आहेत.

शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीतजेव्हा शेतकऱ्यांच्या हातात पीक येते. तेव्हा नेहमीच दर कमी केले जातात. त्यामुळे दरवर्षीच शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. किमान आठ हजारांच्या वर भाव देणे गरजेचे आहे.   - सखाराम सोनुले, शेतकरी

दरवर्षीच शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांना सामोर जावे लागते. परंतु, शासनाकडून हवा तेवढा भाव कधीच शेतकऱ्यांना दिला जात नाही. त्यामुळे ते नेहमीच कर्जबाजारी असतात.                       - पवन मडावी, शेतकरी

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड