शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 22:43 IST

गतवर्षी सोयाबीनला दहा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. नंतर कमी होऊन तो पहिले आठ व नंतर सहा हजार रुपयांवर स्थिरावला होता. मात्र सोयाबीनचा हंगाम सुरू होताच दरात घसरण सुरू झाल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे शेतमालाच्या भाव वाढवण्याची मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सोयाबीनच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. नवे सोयाबीन बाजारात येताच व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहे. क्विंटलमागे हजार रुपयांची घसरण झाली आहे. मागील महिन्यात पाच ते सहा हजारांवर असलेला सोयाबीनचा भाव आता चार ते साडेचार हजारांवर आलेला आहे. त्यामुळे सोयाबीनची दरवाढ झाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. अन्यथा यंदा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.यंदा दोन-अडीच महिन्यांपासून सतत पाऊस सुरू आहे. किमान दीड ते दोन लाख हेक्टरवील सोयाबीनचे नुकसान झाल्याने उत्पादनात कमी येणार आहे. काढणीच्या हंगामातही मध्ये-मध्ये पाऊस सुरू आहे. सोयाबीनच्या गंज्या पावसाने भिजत आहेत. गतवर्षी सोयाबीनला दहा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. नंतर कमी होऊन तो पहिले आठ व नंतर सहा हजार रुपयांवर स्थिरावला होता. मात्र सोयाबीनचा हंगाम सुरू होताच दरात घसरण सुरू झाल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे शेतमालाच्या भाव वाढवण्याची मागणी होत आहे.

सोयाबीनवर केलेला खर्चही निघेनायंदा पावसाने वेळी अवेळी हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. उताराही कमी झाला आहे. सोयाबीन वरील खर्चही निघणार की नाही,अशी भीती आहे.

मूग, उडदाची आवक निरंकजिल्ह्यातील मूग व उडदाचे पीक उशिराच्या पावसाअभावी बाद झाले आहे. यामध्ये जे पीक बचावले,ते अतिवृष्टीमुळे खराब झाले असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये मूग व उडदाची आवक निरंक असल्याचे दिसून येते.

पावसामुळे सोयाबीनचे भाव घसरलेनव्या सोयाबीनमध्ये अधिक आर्द्रता असल्याने दरात कमी आलेली आहे. जुन्या सोयाबीनचे दर मात्र पाच हजारांच्यावर आहे. याशिवाय पावसाने भिजलेले सोयाबीनचे दर २२०० पासून सुरू आहेत.

शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीतजेव्हा शेतकऱ्यांच्या हातात पीक येते. तेव्हा नेहमीच दर कमी केले जातात. त्यामुळे दरवर्षीच शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. किमान आठ हजारांच्या वर भाव देणे गरजेचे आहे.   - सखाराम सोनुले, शेतकरी

दरवर्षीच शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांना सामोर जावे लागते. परंतु, शासनाकडून हवा तेवढा भाव कधीच शेतकऱ्यांना दिला जात नाही. त्यामुळे ते नेहमीच कर्जबाजारी असतात.                       - पवन मडावी, शेतकरी

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड