शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

जिल्ह्यातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:53 IST

शेतकऱ्यांना सन २०१८ चा पिक विमा अद्यापही मिळालेला नाही. आधार लिंकचे कारण सांगून शेतकºयांची पिळवणूक केली जात आहे. राज्यातील शेतकरी मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. कृषी विभाग, विमा कंपन्या व जिल्हा प्रशासनाला सक्तीचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची व्यवस्था सरकारने करावी, चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा आदी मागण्याही करण्यात आल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : संभाजी ब्रिगेडची कर्जमुक्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तसेच विमा कंपन्यांकडून शेतीच्या नुकसानीचा व्यवस्थित सर्व्हेकरण्यात आलेला नाही. दुष्काळाने होरपळलेला शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झालेला असून अद्यापही त्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्या कर्जाच्या ओझ्याखाली असून त्यांना कर्जमुक्ती करून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, धान, बाजरी, ज्वारी, उडीद व भाजीपाला आदी पिकांची पेरणी केली होती. संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने नुकसान झाले. जिल्ह्यात अंदाजे ३५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे.शेतकऱ्यांना सन २०१८ चा पिक विमा अद्यापही मिळालेला नाही. आधार लिंकचे कारण सांगून शेतकºयांची पिळवणूक केली जात आहे. राज्यातील शेतकरी मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. कृषी विभाग, विमा कंपन्या व जिल्हा प्रशासनाला सक्तीचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची व्यवस्था सरकारने करावी, चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा आदी मागण्याही करण्यात आल्या. शिष्टमंडळात विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, जिल्हा सचिव गजानन नागपुरे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सचिन बोधाने, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष भोयर, महानगराध्यक्ष विवेक बोरीकर आदींची उपस्थिती होती.२०२१ मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसींची प्रवर्गनिहाय जनगणना करावी, महापोर्टलच्या माध्यमातून भरतीमध्ये बेरोजगारांवर अन्याय झालेला आहे. सदर परीक्षा पोर्टल बंद करावे, राज्यातील सर्व शासकीय विभागांतर्गत सर्व प्रलंबित सरकारी रिक्त २ लाख पदे तात्काळ भरती करावी, उद्योगांमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा आदी मागण्याही करण्यात आल्या.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती