शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘टोळधाड’ची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

टोळ कीटक हा नाकतोड्याचा एक प्रकार आहे. याचा संधिपाद गटातील कीटक वर्गाच्या ऑथाप्टेरा गणात (कुल-अ‍ॅक्रिडिटी) समावेश होतो. याच्या तीन प्रजाती आहेत. त्यापैकी डेझर्ट लोकस्ट ही अत्यंत खादाड व नुकसानकारक प्रजात आहे. अनुकूल हवामानात टोळांची संख्या खुपच वाढते; त्यांचे थवे तयार होतात; ते इतरत्र थव्याने संचार करू लागतात. त्या स्थितीस थव्याची स्थिती म्हणतात.

ठळक मुद्देआमडी (बेगडे) येथे टोळधाडचे आक्रमक : कृषी विभागाचे अधिकारी दाखल

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : कोरोनाच्या संकटाने अगोदरच शेतकरी संकटात आहे. अशातच आता टोळधाडचे नवे संकट आले आहे. जिल्ह्यात टोळधाडचे संकट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच चिमूर तालुक्यातील तथा वर्धा जिल्हा सीमेवर असलेल्या आमडी (बेगडे) गावातील शेत शिवारात टोळधाडचे आक्रमण झाले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हंगामाआधीच भीतीचे वातावरण पसरले आहे.सोयाबीनवरील पाने खाणारी लष्करी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हरभऱ्यांवरील घाटे अळी, कपाशीवरील बोंडअळी अशा विविध किडीचा पिकांवर सतत हल्ला होत असतो. कोरोनामुळे शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात असताना आता वाळवंटी टोळ (डेझर्ट लोकस्ट) या किडीची भर पडली आहे.सध्या ही टोळधाड हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात या चार राज्यात पसरलेली असून भाजीपाला, कापूस व कडधान्य पिकांचे खूप नुकसान करीत आहे. आता ती महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे. मागील अनेक वर्षातील ही सर्वात भयंकर टोळधाड असावी, असा अंदाज वनस्पती रोगशास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.टोळ कीटक हा नाकतोड्याचा एक प्रकार आहे. याचा संधिपाद गटातील कीटक वर्गाच्या ऑथाप्टेरा गणात (कुल-अ‍ॅक्रिडिटी) समावेश होतो. याच्या तीन प्रजाती आहेत. त्यापैकी डेझर्ट लोकस्ट ही अत्यंत खादाड व नुकसानकारक प्रजात आहे. अनुकूल हवामानात टोळांची संख्या खुपच वाढते; त्यांचे थवे तयार होतात; ते इतरत्र थव्याने संचार करू लागतात. त्या स्थितीस थव्याची स्थिती म्हणतात. टोळांच्या थव्याची अथवा सांघिक स्थितीमधील संचाराला टोळधाड असे म्हणतात. एका दिवसात १५० किलोमीटरपर्यंत अंतर कापण्याची या किडिची क्षमता आहे. त्यामुळे शेतकºयांनी कृषी विभागाच्या सुचनांचे पालण करुन आपल्या पिकांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.नियंत्रणासाठी उपाययोजनाटोळ तरूण अवस्थेत उडू शकत नसल्याने पुढे सरकत येणाºया समुहाच्या वाटेत दोन ते तीन फूट खोल चर काढावी. शेतात मोठा आवाज होईल असे कोणतेही उपाय जसे थाळी, ढोल वाजवून हुसकावून लावता येते. रात्रीच्यावेळी शेतात झाडाझुडपांजवळ शेकोटी करून धूर करणे. तसेच केंद्रीय कीटकनाशके बोर्ड यांच्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करणे.टोळधाडचा जीवनक्रमअंडी, पिल्ले (बाल्यावस्था) व पूर्ण वाढ झालेला प्रौढ अशा तीन अवस्था या किडित आढळतात. किडीची मादी ओलसर रेताड जमिनीत ५० ते १०० अंडी पुंजक्याने घालते. जमिनीतील ओलावा व हवेतील उष्णतामान यावर अंड्यांच्या अवस्थेचा कालावधी अवलंबून असतो. साधारणत: दोन ते चार आठवड्यांनी अंडी फुटून बिनपंखांची पिल्ले बाहेर पडतात. किडीची बाल्यावस्था चार ते सहा आठवडे राहते. या कालावधीत तीन ते पाच दिवसांच्या अंतराने पिल्ले पाचवेळा कात टाकतात व त्यांना पंख फुटतात. कडधान्ये, भाजीपाला, फळपिकांचे नुकसान करतात.शेतकऱ्यांनी घाबरु नयेचिमूर तालुक्यातील आमडी येथील शेतकरी शालिक विटाळे, रत्नाकर विटाळे, राजू पाटील झाडे, विजय नामदेव शेंडे, अनंता गलांडे, मोहन झाडे, अमृत गाठे, राजू झिकार, नंदकिशोर चदनखेडे यांच्या शेतात टोळधाडने आक्रमण केले. याबाबत कृषी विभागाला माहिती मिळताच कृषी विज्ञान केंद्र सिंंदेवाहीचे वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. राठोड, डॉ विनोद नागदेवते, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी सिंदेवाही, वरोरा यांनी प्रत्यक्ष नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली असता टोलधाडीचे अल्प प्रमाण असून ही टोळधाड भटकून आली. शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे आवाहन करुन ती हाकलून लावण्याबाबत मार्गदर्शन केले.खरीप हंगामातील पिकांनाही या किडीचा धोका होण्याची शक्यता आहे. टोळधाड आल्यास समुहाच्या वाटेवर दोन ते तीन फूट खोल चर काढून, शेतात मशाली पेटवून आणि टायर जाळून धूर करून तसेच थाळी वाजवून टोळ नियंत्रणात आणू शकतो. टोळधाड प्रतिबंधासाठी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपाययोजना कराव्या.- ज्ञानदेव तिखेकृषी अधिकारी, चिमूर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती