शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पकडीगुड्डम प्रकल्पाकडून शेतकऱ्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:06 IST

कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडालगत पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला. हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने शेकडो शेतकºयांना पुरेसे पाणी मिळत नाही. मूबलक निधी, रिक्त पदे आणि नियोजनाच्या अभावामुळे सिंचनाची व्याप्ती वाढू शकली नाही. शेतीला पाणी मिळत नसल्याने शेकडो एकर जमीन कोरडवाहू आहे.

ठळक मुद्देकालव्याअभावी सिंचन घटलेशासन व लोकप्रतिनिधींची उदासिनताविविध कामे रखडली

जयंत जेनेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडालगत पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला. हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने शेकडो शेतकºयांना पुरेसे पाणी मिळत नाही. मूबलक निधी, रिक्त पदे आणि नियोजनाच्या अभावामुळे सिंचनाची व्याप्ती वाढू शकली नाही. शेतीला पाणी मिळत नसल्याने शेकडो एकर जमीन कोरडवाहू आहे.पकडीगुडुम धरणात प्रचंड गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक योग्यरित्या होत नाही. कालवे बुजल्याने शेतामध्ये पाणी पोहोचायला अडचणी निर्माण झाल्या. ेसिंचनाची सोय असूनही कालव्याअभावी शेकडो शेतकºयांना धरणातील पाण्याचा लाभ घेता येत नाही. काही शेतकºयांच्या जमिनी कोरडवाहू झाल्या आहेत. या प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी १९९० ला सोनुर्ली येथे प्रकल्प कार्यालय व कर्मचारी वसाहत तयार केली गेली. मात्र प्रकल्पाच्या निर्मितीपासूनच ही वसाहत ओस पडली आहे. वसाहतीचे दारे, खिडक्या चोरट्यांनी लंपास केली. संबंधित अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष असल्याने कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेली वसाहत सध्या बेवारस आहे. सिंचन प्रकल्पाची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी वनसडी किंवा कोरपना येथे कार्यालय उभारणे गरजेचे होते. पण, प्रकल्पासून २० किमी अंतरावरील गडचांदूर येथे कार्यालय उभारण्यात आले. या प्रकल्पाकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही, अशी स्थिती झाली. अमलनाला व पकडीगुड्डम प्रकल्पामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येवू शकते. परंतु, नियोजन व निधीची तरतूदीकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांचा अपेक्षाभंग झाला आहे. प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाºया पाटबंधारे विभागात कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेवून शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. सिंचन प्रकल्पाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण केल्यास पर्यटनाला चालना मिळू शकते. लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळा करून आहे.शेकडो एकर जमीन कोरडवाहूकोरपना तालुक्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संंख्या सर्वाधिक आहे. कापूस व सोयाबिनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, ही शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेतल्यास शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येवू शकते. या प्रकल्पाचा अनेक शेतकºयांना लाभ मिळत आहे. पण, सिंचनाखालील जमिनीचे हेक्टरी क्षेत्र अद्याप वाढले नाही. कोरडवाहू शेती करणाºया शेतकऱ्यांचे प्रमाण आजही चिंताजनक असल्याचे दिसून येते. त्यामुळे या धरणासाठी मूबलक निधी देवून शेतकऱ्यांची स्थिती बदलावी, अशी मागणी केली जात आहे.दीर्घकालीन नियोजनातूनच बदलणार स्थितीतालुक्याच्या भौगोलिक व कृषी स्थितीनुसार मोठ्या सिंचन प्रकल्पाची गरज होती. पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पामुळे अपेक्षा पूर्ण झाली. पाटबंधारे विभागाने प्रकल्पाकडे लक्ष दिल्याने बरीच कामे मार्गी लागली. पण, आर्थिक दुष्टचक्रात अडकलेल्या शेतीला बाहेर काढण्यासाठी सिंचनाची व्याप्ती वाढविण्याशिवाय पर्याय नाही. त्याकरिता उपलब्ध निधीचा योग्य वापर करून दीर्घकालीन नियोजन करणे काळाची गरज आहे. त्यातूनच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येईल.पाठपुराव्याशिवाय पर्याय नाहीपकडीगुड्डम हा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. तालुक्यातील पारंपरिक शेतीची सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे कृषीसिंचन साध्य होवू शकते. नगदी पिके घेणाºया शेतकऱ्यांची संख्या वाढण्यास मोठा वाव आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा, करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली.