शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पकडीगुड्डम प्रकल्पाकडून शेतकऱ्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:06 IST

कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडालगत पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला. हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने शेकडो शेतकºयांना पुरेसे पाणी मिळत नाही. मूबलक निधी, रिक्त पदे आणि नियोजनाच्या अभावामुळे सिंचनाची व्याप्ती वाढू शकली नाही. शेतीला पाणी मिळत नसल्याने शेकडो एकर जमीन कोरडवाहू आहे.

ठळक मुद्देकालव्याअभावी सिंचन घटलेशासन व लोकप्रतिनिधींची उदासिनताविविध कामे रखडली

जयंत जेनेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडालगत पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला. हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने शेकडो शेतकºयांना पुरेसे पाणी मिळत नाही. मूबलक निधी, रिक्त पदे आणि नियोजनाच्या अभावामुळे सिंचनाची व्याप्ती वाढू शकली नाही. शेतीला पाणी मिळत नसल्याने शेकडो एकर जमीन कोरडवाहू आहे.पकडीगुडुम धरणात प्रचंड गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक योग्यरित्या होत नाही. कालवे बुजल्याने शेतामध्ये पाणी पोहोचायला अडचणी निर्माण झाल्या. ेसिंचनाची सोय असूनही कालव्याअभावी शेकडो शेतकºयांना धरणातील पाण्याचा लाभ घेता येत नाही. काही शेतकºयांच्या जमिनी कोरडवाहू झाल्या आहेत. या प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी १९९० ला सोनुर्ली येथे प्रकल्प कार्यालय व कर्मचारी वसाहत तयार केली गेली. मात्र प्रकल्पाच्या निर्मितीपासूनच ही वसाहत ओस पडली आहे. वसाहतीचे दारे, खिडक्या चोरट्यांनी लंपास केली. संबंधित अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष असल्याने कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेली वसाहत सध्या बेवारस आहे. सिंचन प्रकल्पाची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी वनसडी किंवा कोरपना येथे कार्यालय उभारणे गरजेचे होते. पण, प्रकल्पासून २० किमी अंतरावरील गडचांदूर येथे कार्यालय उभारण्यात आले. या प्रकल्पाकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही, अशी स्थिती झाली. अमलनाला व पकडीगुड्डम प्रकल्पामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येवू शकते. परंतु, नियोजन व निधीची तरतूदीकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांचा अपेक्षाभंग झाला आहे. प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाºया पाटबंधारे विभागात कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेवून शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. सिंचन प्रकल्पाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण केल्यास पर्यटनाला चालना मिळू शकते. लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळा करून आहे.शेकडो एकर जमीन कोरडवाहूकोरपना तालुक्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संंख्या सर्वाधिक आहे. कापूस व सोयाबिनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, ही शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेतल्यास शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येवू शकते. या प्रकल्पाचा अनेक शेतकºयांना लाभ मिळत आहे. पण, सिंचनाखालील जमिनीचे हेक्टरी क्षेत्र अद्याप वाढले नाही. कोरडवाहू शेती करणाºया शेतकऱ्यांचे प्रमाण आजही चिंताजनक असल्याचे दिसून येते. त्यामुळे या धरणासाठी मूबलक निधी देवून शेतकऱ्यांची स्थिती बदलावी, अशी मागणी केली जात आहे.दीर्घकालीन नियोजनातूनच बदलणार स्थितीतालुक्याच्या भौगोलिक व कृषी स्थितीनुसार मोठ्या सिंचन प्रकल्पाची गरज होती. पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पामुळे अपेक्षा पूर्ण झाली. पाटबंधारे विभागाने प्रकल्पाकडे लक्ष दिल्याने बरीच कामे मार्गी लागली. पण, आर्थिक दुष्टचक्रात अडकलेल्या शेतीला बाहेर काढण्यासाठी सिंचनाची व्याप्ती वाढविण्याशिवाय पर्याय नाही. त्याकरिता उपलब्ध निधीचा योग्य वापर करून दीर्घकालीन नियोजन करणे काळाची गरज आहे. त्यातूनच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येईल.पाठपुराव्याशिवाय पर्याय नाहीपकडीगुड्डम हा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. तालुक्यातील पारंपरिक शेतीची सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे कृषीसिंचन साध्य होवू शकते. नगदी पिके घेणाºया शेतकऱ्यांची संख्या वाढण्यास मोठा वाव आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा, करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली.