शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:26 IST

एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले. सूर्याचा हा प्रकोप मे महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत कायमच आहे. पारा सतत ४५ अंशापार जात आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावशिवार व जंगललगातचा परिसर ओसाड पडला आहे.

ठळक मुद्देतजवीज करताना जीव मेटाकुटीस : चाºया-पाण्याविना कसे जगवावे पशुधन ?, शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले. सूर्याचा हा प्रकोप मे महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत कायमच आहे. पारा सतत ४५ अंशापार जात आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावशिवार व जंगललगातचा परिसर ओसाड पडला आहे. परिणामी जनावरांच्या चाऱ्यांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविण्यासाठी चारा दुकानातून विकत घ्यावा लागत आहे. यामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकºयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला होता. फेब्रुवारी, मार्च महिन्यात तर स्थिती आणखी बिकट झाली होती. नलेश्वर, चंदई, लभानसराड यासह आणखी दोन प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. नदी, नाले, तलाव, बोड्या हे ग्रामीण भागातील जलस्रोत चिंताजनक स्थितीत आले आहे. पाण्याची स्थिती नाजुकच आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत आटले आहेत. नदी-नाल्यांसोबतच नागरिकांच्या घरातील विहिरी, बोअरवेल यांचेही पाणी कमी झाले आहे. एकूणच पाण्याची पातळीच खोल गेल्याने याचा सर्व जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसर पहाडी भाग आहे. या परिसरातील अनेक गावात पाणी नाही. आदिवासींचे गुडे पाण्याविना टाहो फोडत आहे. जिवती, कोरपना, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी, पोंभूर्णा, सिंदेवाही यासह जवळजवळ संपूर्ण तालुक्यातच जलसाठ्यांची स्थिती भयावह आहे.जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने भूईला भेगा पडू लागल्या आहे. त्यामुळे जमिनीवर गवत व इतर तृण नाही. परिणामी गावशिवारात व जंगलालगतच कुठेही जनावरांचा चारा दिसून येत नाही. शेतकरी आपल्या जनावरांना शेतशिवारात किंवा जंगलालगतच्या परिसरात, जिथे पाण्याचे स्रोत आहे, तिथे चराईसाठी सोडायचे. मात्र आता चाराही नाही आणि बोडी, तलाव यासारखे जलस्रोतही आटले आहे. त्यामुळे जनावरांना घरातील गोठ्यातच ठेवून चारा विकत आणून त्यांना द्यावा लागत आहे.हंगाम तोंडावर; हातचा पैसा चाऱ्यावर खर्चशेतकऱ्यांचा खरीप हंगात अगदी तोंडावर आला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांना हंगामासाठी जुळवाजुळव केलेला पैसा चाऱ्यावर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे हंगामासाठी खत, बियाणे यांची तजवीज कशी करावी, असाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.वैतागून पशुधनाची विक्रीचारा आणि पाणी टंचाईमुळे शेतकरी वैतागले आहे. पशुधन जगविण्यासाठी हंगामासाठी ठेवलेला पैसा खर्च होत आहे. त्यामुळे नाईलाजाने अनेक शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी बैलबाजारात नेत आहेत. जनावारांना विकून पावसाळ्यात पुन्हा जनावरे खरेदी करायचे, असा निर्णय अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.पाण्याचा प्रश्न बिकटचाºयासोबत जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. नदी, तलाव, बोड्या यात पाणी नसल्याने जनावरांना पाण्यासाठी कुठे सोडावे, असा प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे. हातपंप, विहिरींनाही पाणी नाही. जिथे पाणी असेल तेथून बैलबंडीवर पाणी आणून जनावरांना पाजावे लागत आहे. यात शेतकरी मोटाकुटीस आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी