शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:26 IST

एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले. सूर्याचा हा प्रकोप मे महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत कायमच आहे. पारा सतत ४५ अंशापार जात आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावशिवार व जंगललगातचा परिसर ओसाड पडला आहे.

ठळक मुद्देतजवीज करताना जीव मेटाकुटीस : चाºया-पाण्याविना कसे जगवावे पशुधन ?, शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले. सूर्याचा हा प्रकोप मे महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत कायमच आहे. पारा सतत ४५ अंशापार जात आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावशिवार व जंगललगातचा परिसर ओसाड पडला आहे. परिणामी जनावरांच्या चाऱ्यांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविण्यासाठी चारा दुकानातून विकत घ्यावा लागत आहे. यामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकºयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला होता. फेब्रुवारी, मार्च महिन्यात तर स्थिती आणखी बिकट झाली होती. नलेश्वर, चंदई, लभानसराड यासह आणखी दोन प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. नदी, नाले, तलाव, बोड्या हे ग्रामीण भागातील जलस्रोत चिंताजनक स्थितीत आले आहे. पाण्याची स्थिती नाजुकच आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत आटले आहेत. नदी-नाल्यांसोबतच नागरिकांच्या घरातील विहिरी, बोअरवेल यांचेही पाणी कमी झाले आहे. एकूणच पाण्याची पातळीच खोल गेल्याने याचा सर्व जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसर पहाडी भाग आहे. या परिसरातील अनेक गावात पाणी नाही. आदिवासींचे गुडे पाण्याविना टाहो फोडत आहे. जिवती, कोरपना, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी, पोंभूर्णा, सिंदेवाही यासह जवळजवळ संपूर्ण तालुक्यातच जलसाठ्यांची स्थिती भयावह आहे.जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने भूईला भेगा पडू लागल्या आहे. त्यामुळे जमिनीवर गवत व इतर तृण नाही. परिणामी गावशिवारात व जंगलालगतच कुठेही जनावरांचा चारा दिसून येत नाही. शेतकरी आपल्या जनावरांना शेतशिवारात किंवा जंगलालगतच्या परिसरात, जिथे पाण्याचे स्रोत आहे, तिथे चराईसाठी सोडायचे. मात्र आता चाराही नाही आणि बोडी, तलाव यासारखे जलस्रोतही आटले आहे. त्यामुळे जनावरांना घरातील गोठ्यातच ठेवून चारा विकत आणून त्यांना द्यावा लागत आहे.हंगाम तोंडावर; हातचा पैसा चाऱ्यावर खर्चशेतकऱ्यांचा खरीप हंगात अगदी तोंडावर आला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांना हंगामासाठी जुळवाजुळव केलेला पैसा चाऱ्यावर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे हंगामासाठी खत, बियाणे यांची तजवीज कशी करावी, असाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.वैतागून पशुधनाची विक्रीचारा आणि पाणी टंचाईमुळे शेतकरी वैतागले आहे. पशुधन जगविण्यासाठी हंगामासाठी ठेवलेला पैसा खर्च होत आहे. त्यामुळे नाईलाजाने अनेक शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी बैलबाजारात नेत आहेत. जनावारांना विकून पावसाळ्यात पुन्हा जनावरे खरेदी करायचे, असा निर्णय अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.पाण्याचा प्रश्न बिकटचाºयासोबत जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. नदी, तलाव, बोड्या यात पाणी नसल्याने जनावरांना पाण्यासाठी कुठे सोडावे, असा प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे. हातपंप, विहिरींनाही पाणी नाही. जिथे पाणी असेल तेथून बैलबंडीवर पाणी आणून जनावरांना पाजावे लागत आहे. यात शेतकरी मोटाकुटीस आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी