रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची धुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:46+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तांदूळ, गहु, ज्वारी, हरभरा, जवस पिकांचे उत्पादन घेण्यात येते. सर्व पीक हातात येणाच्या तयारीत असताना मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या सोयाबिनला कोंब फुटले तर काहींचे सोयाबिन काळे पडले.

रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची धुरा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. सद्या चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी हंगामास सुरुवात झाली आहे. आता याच हंगामावर शेतकऱ्यांची धुरा अंवलबून आहे. खरीप हंगामात शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडल्याने शेतकऱ्यांना पैसा गोळा करताना कसरत करावी लागत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तांदूळ, गहु, ज्वारी, हरभरा, जवस पिकांचे उत्पादन घेण्यात येते. सर्व पीक हातात येणाच्या तयारीत असताना मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या सोयाबिनला कोंब फुटले तर काहींचे सोयाबिन काळे पडले. शेतकऱ्यांचे पुढील नियोजन हे खरीप पिकांच्या उत्पादनावर असते. मात्र नगदी पिके समजल्या जाणाऱ्यां सोयाबीन, ज्वारी, कापूस पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन फसले. त्यातच सध्या रब्बी हंगामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची रब्बी पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्याती शेकडो शेतशिवारात रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाच्या पेरणीसाठी पेरणीपूर्वी मशागतीला वेग आला आहे. शेतीसाठी बियाणे, खते विकत घेण्याचीसुद्धा लगबग सुरु झाली. शेती मशागतीपासून तर बियाण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकºयांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली मदत तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अनुदानावर बियाणे देण्याची मागणी
खरीप हंगामातील नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे बियाणे घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पैसाच नसल्याचे चित्र आहे. पैशांअभावी अनेक शेतकऱ्यांची जमीन पडीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने रब्बी हंगामासाठी शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बँकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ
रब्बी हंगामाच्या मशागतीची कामे अंतिम टप्यात आली असून पेरणी वेळेवर करण्यासाठी शेतकºयांनी खत, बियाण्याची जुळवाजुळव सुरु केली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा फटका बसल्याने त्यांच्याकडे रब्बी हंगामासाठी पैसे उरले नाहीत. बँकेच्या दारात गेले असता बँकांकडूनही पीककर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे पेरणीसाठी बि-बियाण्याची जमवाजमव कशी करावी, याचीही अनेक शेतकºयांना चिंता सतावत आहे.