शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

साहेब, किमान नुकसानीचे पंचनामे तरी करा हो...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:27 IST

वर्धा नदीला दुसऱ्यांदा पूर : शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल

राजेश माहूरवार लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीला आलेल्या पुराने बळीराजा पुरता खचला आहे. शेतकऱ्याने पहिल्यांदा पेरणी केली. ती बिनकामाची ठरली. नव्या उमेदीने दुसऱ्यांदा पेरणी केली आणि पुराने संपूर्ण शेतीच पाण्याखाली आली. पदरमोड करून, खासगी कर्ज उसनवारी करून कसातरी मार्ग काढून शेतीत पुन्हा पिके लावली. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे पुन्हा पिके पाण्याखाली आली. यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे.

यापूर्वीच्या पूरस्थितीत अनेकांचे पंचनामे झाले. मोठ्या घोषणा झाल्या. पण मदत मात्र प्रत्यक्षात मिळाली नाही. आपल्या शेतीला जिवंत ठेवण्यासाठी पूर्ण जीव ओतणारा बळीराजा मात्र उपेक्षितच आहे. शेतकऱ्यांची फार मोठी अपेक्षाही नाही. किमान नुकसानीचे पंचनामे तरी करा हेच त्यांचे म्हणणे आहे. पण सरकार व काही अधिकारी याकडे लक्षच द्यायला तयार नाहीत. मतांचे राजकारण करण्यासाठी सर्वच पक्ष बहिणींना लाडकी म्हणताहेत. पण गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील एका शेतकरी बहिणीने आपली व्यथा जाहीर करीत या सरकारचा व प्रशासनाचा बुरखाच फाडला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील विद्या चौधरी या महिला शेतकऱ्याने आता टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. एका व्हिडीओतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत आमची शेतातली मिरची ही पाण्याखाली आली असून लाखोंचे नुकसान झाले. किमान नुकसानीचे पंचनामे व्हावे, अशी मागणी केली आहे. वर्धा नदीला पूर आल्याने तोहगाव कुडेसावलीसह, परसोडी, लाठी, अडेगाव, नंदवर्धन, पानोरा, आर्वी अशा अनेक नदीकाठी असणाऱ्या गावांना फटका बसला आहे.

पहिल्यांदा कापूस शेतात लावल्यानंतर धान पेरणी केल्यानंतर वर्धा नदीला मोठा पूर आला. त्याच्यामुळे अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले. नंतर काहींनी मिरचीची रोपे लावली होती आणि त्यांची लागवड आता आठवडाभरापूर्वी करण्यात आली. मात्र दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने ती मिरचीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे आता कंबरडेच मोडले आहे. यंदा शेती उद्ध्वस्त झाली असून एक रुपयाचेही पीक त्यांना घेता येणार नाही.

नुकसानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल तालुक्यातील अडेगाव येथील विद्या बालाजी चौधरी यांनी शेतीच्या नुकसानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत किमान प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावे, अन्यथा आत्महत्येचा पर्याय निवडावा लागेल, अशी भावना व्यक्त केली

"नुकसानग्रस्तांचे पंचनाम्याचे आदेश पथक बनवून त्यांना दिले आहेत. पूर ओसरल्यानंतर पंचनामे सुरू होतील. व्हिडीओमधील महिलेचे मत ऐकले. विद्या बालाजी चौधरी ही व्हिडीओतील महिला कुसुमबाई वसंत चौधरी यांची सून आहे. पूर आला होता, तेव्हा शेतात सर्व्हे केला आहे. "- शुभम बहाकर, तहसीलदार, गोंडपिपरी.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर