शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

साहेब, किमान नुकसानीचे पंचनामे तरी करा हो...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:27 IST

वर्धा नदीला दुसऱ्यांदा पूर : शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल

राजेश माहूरवार लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीला आलेल्या पुराने बळीराजा पुरता खचला आहे. शेतकऱ्याने पहिल्यांदा पेरणी केली. ती बिनकामाची ठरली. नव्या उमेदीने दुसऱ्यांदा पेरणी केली आणि पुराने संपूर्ण शेतीच पाण्याखाली आली. पदरमोड करून, खासगी कर्ज उसनवारी करून कसातरी मार्ग काढून शेतीत पुन्हा पिके लावली. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे पुन्हा पिके पाण्याखाली आली. यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे.

यापूर्वीच्या पूरस्थितीत अनेकांचे पंचनामे झाले. मोठ्या घोषणा झाल्या. पण मदत मात्र प्रत्यक्षात मिळाली नाही. आपल्या शेतीला जिवंत ठेवण्यासाठी पूर्ण जीव ओतणारा बळीराजा मात्र उपेक्षितच आहे. शेतकऱ्यांची फार मोठी अपेक्षाही नाही. किमान नुकसानीचे पंचनामे तरी करा हेच त्यांचे म्हणणे आहे. पण सरकार व काही अधिकारी याकडे लक्षच द्यायला तयार नाहीत. मतांचे राजकारण करण्यासाठी सर्वच पक्ष बहिणींना लाडकी म्हणताहेत. पण गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील एका शेतकरी बहिणीने आपली व्यथा जाहीर करीत या सरकारचा व प्रशासनाचा बुरखाच फाडला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील विद्या चौधरी या महिला शेतकऱ्याने आता टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. एका व्हिडीओतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत आमची शेतातली मिरची ही पाण्याखाली आली असून लाखोंचे नुकसान झाले. किमान नुकसानीचे पंचनामे व्हावे, अशी मागणी केली आहे. वर्धा नदीला पूर आल्याने तोहगाव कुडेसावलीसह, परसोडी, लाठी, अडेगाव, नंदवर्धन, पानोरा, आर्वी अशा अनेक नदीकाठी असणाऱ्या गावांना फटका बसला आहे.

पहिल्यांदा कापूस शेतात लावल्यानंतर धान पेरणी केल्यानंतर वर्धा नदीला मोठा पूर आला. त्याच्यामुळे अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले. नंतर काहींनी मिरचीची रोपे लावली होती आणि त्यांची लागवड आता आठवडाभरापूर्वी करण्यात आली. मात्र दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने ती मिरचीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे आता कंबरडेच मोडले आहे. यंदा शेती उद्ध्वस्त झाली असून एक रुपयाचेही पीक त्यांना घेता येणार नाही.

नुकसानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल तालुक्यातील अडेगाव येथील विद्या बालाजी चौधरी यांनी शेतीच्या नुकसानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत किमान प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावे, अन्यथा आत्महत्येचा पर्याय निवडावा लागेल, अशी भावना व्यक्त केली

"नुकसानग्रस्तांचे पंचनाम्याचे आदेश पथक बनवून त्यांना दिले आहेत. पूर ओसरल्यानंतर पंचनामे सुरू होतील. व्हिडीओमधील महिलेचे मत ऐकले. विद्या बालाजी चौधरी ही व्हिडीओतील महिला कुसुमबाई वसंत चौधरी यांची सून आहे. पूर आला होता, तेव्हा शेतात सर्व्हे केला आहे. "- शुभम बहाकर, तहसीलदार, गोंडपिपरी.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर