वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:24+5:30
राजुरा तालुक्यातील जोगापूर वनक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वाघांचा मुक्त संचार असून वाघाची संख्या वाढली असल्याचे समजते आणि हा महिना वन्यप्राणीचा संक्रमण काळ असल्याने हिंस्त्र असतात. परिणामी याच महिन्यात शेतात राखण करणाऱ्या मूर्ती येथील श्रीहरी साळवे याच्यावर हल्ला करून जागीच ठार केले होते, तर त्याच आठवड्यात चिचबोली येथील श्यामराव टेकाम याच्यावरही वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले.

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेंबूरवाही नियत क्षेत्रच्या कक्ष क्रमांक १६८ मध्ये दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वाघाने हल्ला करून चिचबोडी येथील शेतकरी देविदास चंदू तलांडे याला जखमी केल्याची घटना घडली. १५ दिवसातील ही दुसरी घटना चिचबोडी शिवारात घडली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण असून कापूस वेचणी आणि धान कापणी कामे खोळंबली आहेत.
राजुरा तालुक्यातील जोगापूर वनक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वाघांचा मुक्त संचार असून वाघाची संख्या वाढली असल्याचे समजते आणि हा महिना वन्यप्राणीचा संक्रमण काळ असल्याने हिंस्त्र असतात. परिणामी याच महिन्यात शेतात राखण करणाऱ्या मूर्ती येथील श्रीहरी साळवे याच्यावर हल्ला करून जागीच ठार केले होते, तर त्याच आठवड्यात चिचबोली येथील श्यामराव टेकाम याच्यावरही वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे वन कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त गस्त वाढविली आहे. परंतु वाघ या भागातील शिवारात रोजच दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आणि इतर नागरिकांत वाघाची दहशत आहे. अशातच गुरुवारी दुपारी परत चिचबोली येथे वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली. यामुळे जनतेत वन विभागाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि अतिरिक्त वनकर्मचारी नियुक्त करून गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.