शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा दाटली आसवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 17:51 IST

पावसाळा संपायला आला आहे पण परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीन पीक पूर्णतः काळे पडले आहे. पावसामुळे पूर्ण पीक उदध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे.

चंद्रपूर : अवकाळी पडलेल्या पावसाने खरीप हंगामातील पीक झाडावरच काळे पडत असून कापूस, सोयाबीन मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून सोयाबीनच्या कापणी करून ठेवलेल्या पिकाला कोंब अंकुरण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा आसवे दाटली आहे.

पावसाळा संपायला आला आहे. परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीन पीक पूर्णतः काळे पडले आहे. पावसामुळे पूर्ण पीक उदध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे. राजुरा तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने हाती येणारे कापूस, सोयाबीनचे पीक झाडावरच काळे पडले आहे.

कापूस वेचणीला आला असताना अचानक परतीच्या पावसाने हजेरी लावली. गोवरी, सास्ती, माथरा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी,खामोणा, चंदणवाही, पोवनी, वरोडा, धिडशी, चार्ली, नीर्ली, कढोली, मानोली, बाबापूर परिसरात पावसामुळे कपाशीची बोंडे सडून गेली आहेत.

दिवाळीसारखा आनंददायी सण आपल्यालाही साजरा करता यावा, आर्थिक अडचण भागविता यावी यासाठी शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाची लागवड करतात; परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिके पूर्णतः उदध्वस्त झाली आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस