शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा दाटली आसवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 17:51 IST

पावसाळा संपायला आला आहे पण परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीन पीक पूर्णतः काळे पडले आहे. पावसामुळे पूर्ण पीक उदध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे.

चंद्रपूर : अवकाळी पडलेल्या पावसाने खरीप हंगामातील पीक झाडावरच काळे पडत असून कापूस, सोयाबीन मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून सोयाबीनच्या कापणी करून ठेवलेल्या पिकाला कोंब अंकुरण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा आसवे दाटली आहे.

पावसाळा संपायला आला आहे. परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीन पीक पूर्णतः काळे पडले आहे. पावसामुळे पूर्ण पीक उदध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे. राजुरा तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने हाती येणारे कापूस, सोयाबीनचे पीक झाडावरच काळे पडले आहे.

कापूस वेचणीला आला असताना अचानक परतीच्या पावसाने हजेरी लावली. गोवरी, सास्ती, माथरा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी,खामोणा, चंदणवाही, पोवनी, वरोडा, धिडशी, चार्ली, नीर्ली, कढोली, मानोली, बाबापूर परिसरात पावसामुळे कपाशीची बोंडे सडून गेली आहेत.

दिवाळीसारखा आनंददायी सण आपल्यालाही साजरा करता यावा, आर्थिक अडचण भागविता यावी यासाठी शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाची लागवड करतात; परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिके पूर्णतः उदध्वस्त झाली आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस