शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा दाटली आसवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 17:51 IST

पावसाळा संपायला आला आहे पण परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीन पीक पूर्णतः काळे पडले आहे. पावसामुळे पूर्ण पीक उदध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे.

चंद्रपूर : अवकाळी पडलेल्या पावसाने खरीप हंगामातील पीक झाडावरच काळे पडत असून कापूस, सोयाबीन मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून सोयाबीनच्या कापणी करून ठेवलेल्या पिकाला कोंब अंकुरण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा आसवे दाटली आहे.

पावसाळा संपायला आला आहे. परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीन पीक पूर्णतः काळे पडले आहे. पावसामुळे पूर्ण पीक उदध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे. राजुरा तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने हाती येणारे कापूस, सोयाबीनचे पीक झाडावरच काळे पडले आहे.

कापूस वेचणीला आला असताना अचानक परतीच्या पावसाने हजेरी लावली. गोवरी, सास्ती, माथरा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी,खामोणा, चंदणवाही, पोवनी, वरोडा, धिडशी, चार्ली, नीर्ली, कढोली, मानोली, बाबापूर परिसरात पावसामुळे कपाशीची बोंडे सडून गेली आहेत.

दिवाळीसारखा आनंददायी सण आपल्यालाही साजरा करता यावा, आर्थिक अडचण भागविता यावी यासाठी शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाची लागवड करतात; परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिके पूर्णतः उदध्वस्त झाली आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस