शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:31 IST

चंद्रपूर : प्रत्येकाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. अनेक वेळा अधिक पाणी पिण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो; पण प्रमाणापेक्षा अधिक ...

चंद्रपूर : प्रत्येकाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. अनेक वेळा अधिक पाणी पिण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो; पण प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणेही शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसे डिहायड्रेशनचा धोका होताे, तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढेच पाणी पिणे गरजेचे आहे.

आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळनिर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचातील विषारी पदार्थांचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. मात्र, काही जण प्रमाणाबाहेर पाणी पितात. अनेक जण एकाच वेळी दोन ते तीन ग्लास पाणी पितात. ही बाब शरीरासाठी फायद्याची ठरण्याऐवजी नुकसानदायक ठरण्याची भीती असते.

बाॅक्स

शरीरात पाणी जास्त झाले तर

गरजेपेक्षा अधिक पाणी पिल्यास वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होतो. व्यक्तीची झोप बिघडते. त्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ज्यांना लिव्हरचा त्रास आहे, त्यांनी जास्त पाणी पिऊ नये. हृदयाचे आजार असलेल्यांनी जास्त पाणी पिऊ नये.

बाॅक़्स

शरीरात पाणी कमी पडले तर

पाणी कमी पिले तर किडनी स्टोनसारखे आजार होऊ शकतात. फुप्फुसांना धोका होऊ शकतो. डिहायड्रेशन होऊ शकते. खूप थकवा जाणवतो. थोडी मेहनत केल्यावरही लगेच थकवा जाणवतो. पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याच वेळा शरीरास कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होते.

बाॅक्स

जास्त पाणी पिणे चांगले असले तरीही त्याचे विपरीत परिणाम होतात. वारंवार लघवीला जावे लागते. यामुळे रात्रीच्या वेळी झोप योग्य होत नाही. त्यामुळे प्रमाणात आणि योग्य वेळेत पाणी पिणे गरजेचे आहे. कमी पाणी पिल्याने किडनी स्टोन, डिहायड्रेशन होऊ शकते. लिव्हर, हृदयाचा त्रास असलेल्यांनी जास्त पाणी पिऊ नये. पाणी प्रमाणात पिणे चांगले.

डाॅ. अशोक वासलवार

हृदयरोगतज्ज्ञ, चंद्रपूर