डिमांड भरून १५ वर्षांनंतरही कृषीपंपाला वीज जोडणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:54 IST2017-08-13T23:54:10+5:302017-08-13T23:54:50+5:30

कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी म.रा.वि.वि. कंपनी भद्रावतीच्या कार्यालयात सन २००२ ला डिमांड भरली.

Even after 15 years of filling the demand, there is no electricity connection to the farmer | डिमांड भरून १५ वर्षांनंतरही कृषीपंपाला वीज जोडणी नाही

डिमांड भरून १५ वर्षांनंतरही कृषीपंपाला वीज जोडणी नाही

ठळक मुद्देवीज वितरण कंपनी विरोधात ग्राहकांच्या अनेक तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी म.रा.वि.वि. कंपनी भद्रावतीच्या कार्यालयात सन २००२ ला डिमांड भरली. त्यानंतर अनेक वेळा त्याबाबत विचारणा केली. अधिकाºयांकडून थातूरमातूर उत्तरे देण्यात आली. आज १५ वर्षे झालीत तरीही कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यात आला नाही. अशी व्यथा येथील रहिवाशी नामपल्लीवार यांनी महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी, मर्यादित भद्रावती उपविभागाच्या ग्राहक संवाद व सुचना मेळाव्यात मांडली.
भद्रावतीत शनिवारी ग्राहक सुचना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरी तथा ग्रामीण भागाच्या अनेक तक्रारी याप्रसंगी ग्राहकांनी मांडल्या. २५ वर्षापासून जुने असलेले विजेचे तार बदलविण्यात यावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली. एलएडी बल्ब लावूनही विजेचे बिल वाढतच आहे, युनिटमध्ये प्रचंड वाढ होत आहे, लाईन कनेक्शन तोडण्याच्या धमक्या वीज कर्मचाºयांकडून दिल्या जात असून ग्राहकांना नाहक त्रास दिल्या जात आहे, ग्रामीण भागातील पिपरी (दे) येथील रहिवाशी गोपाळकृष्ण कुटेमाटे यांना १२ हजार १६० रुपयांचे वीजबिल आले. अवास्तव बिलाच्या अनेक तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या, टोल फ्री क्रमांकाचा उपयोग होत नाही, कार्यालयातील फोन कर्मचारी जाणूनबुजून उचलत नाही, याही तक्रारी करण्यात आल्या. शेतकºयांना वीज पंपाचे कनेक्शन न दिल्याने व योग्य वीज पुरवठा होत नसल्याने शेतातली उभी पिके खराब होत आहेत. गोविंद लेआऊट येथील विजेचे खांब वाकले आहे, हवा आली तरी वीज जाते, अशा अनेक तक्रारी या प्रसंगी करण्यात आल्या. यावेळी ग्राहक पंचायतचे जिल्हा कोषाध्यक्ष शेखर घुमे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर डुकरे, भास्कर ताजणे, काँग्रेसचे डॉ.विजय देवतळे, दिलीप ठेंगे, तसेच नामपल्लीवार, खुटेमाटे यांनी आपल्या तक्रार केली. मेळाव्याला मराविवि कंपनीचे अधीक्षक अभियंता हरिष गजबे, कार्यकारी अभियंता राठी, उपकार्यकारी अभियंता सचिन बदखल, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांच्या तक्रारी घेण्यात आल्या.

Web Title: Even after 15 years of filling the demand, there is no electricity connection to the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.