शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
2
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
3
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
4
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
5
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
6
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
7
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
8
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
9
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
10
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
11
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
12
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
13
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
14
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
15
Pune Crime: पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
16
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
17
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
18
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
19
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
20
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...

प्रवेश प्रक्रियेचा घोडेबाजार तेजीत

By admin | Updated: May 1, 2015 01:16 IST

एप्रिल महिन्यातील शालांत परीक्षा संपल्या आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भटकंती सुरू झाली.

तळोधी (बा.): एप्रिल महिन्यातील शालांत परीक्षा संपल्या आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भटकंती सुरू झाली. वर्ग पाचवी व वर्ग आठवीमध्ये प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना सुगीचे दिवस आले असले तरी शिक्षकांमध्ये मात्र प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची टी.सी. मिळविण्याकरीता आपसातच चढाओढ दिसून येत आहे. त्यामुळे तळोधी (बा.) परिसरात एका टी.सी.चा दर पाच हजार रुपयांवर पोहचल्याचे शिक्षकांकडून बोलले जात आहे.शासनाच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत १४ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना शिक्षण देणे बंधनकारक आहे. या अध्यादेशाच्या शैक्षणिक धोरणानुसार वर्ग १ ते ५ पूर्व माध्यमिक, वर्ग ६ ते ८ प्राथमिक, वर्ग ९ ते १० माध्यमिक व वर्ग ११ आणि १२ उच्च माध्यमिक असे शाळांचे वर्गीकरण करण्यात आले. परंतु, सध्याच्या परिस्थितीनुसार वर्ग १ ते ४, वर्ग ५ ते ७, वर्ग ८ ते १० व वर्ग ११ व १२ या स्तरावर शाळेची रचना आहे. वर्ग ४ थीची शाळा असलेल्या प्रत्येक शाळेला वर्ग ५ वा जोडणे व वर्ग ७ वा असलेल्या जिल्हा परिषद शाळांना वर्ग ८ वा जोडण्याचा मागील वर्षी शासन स्तरावरुन प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नात शासनाला काही अंशी यश मिळाले तर अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत वर्ग ५ व वर्ग ८ वा सुरूच झाले नाही. परंतु परिसरातील जिल्हा परिषद शाळांत वर्ग ५ वा व वर्ग ८ वीचे वर्ग सुरू झाले त्या खासगी माध्यमिक शाळातील संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांना आपल्या शाळातील वर्ग ५ व ८ वीच्या तुकड्या टिकविण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. शासनाच्या धोरणानुसार वर्ग ५ चे वर्ग चवथ्या वर्गांना शाळांना जोडणे आवश्यक आहे. परंतु जिल्हा परिषद शाळांत वर्ग ४ असणाऱ्या शाळांत वर्ग ५ वी चे वर्ग सुरू केले असले तरी वर्ग ५ ते १० च्या शाळातील वर्ग ५ वीचे वर्ग बंद केले नाही. त्यामुळे शाळा संचालकांनी वर्ग ५ व ८ वीच्या तुकड्या टिकविण्यासाठी मुख्याध्यापकांच्या मार्फत शिक्षकांना वेठीस धरणे सुरू केले आहे.याचाच परिणाम म्हणून खासगी माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकडून हजारो रुपयांची वर्गणी केली जात आहे व सदर रक्कम पालकांना प्रलोभन देण्यासाठी सर्रास वापर होत आहे. त्यासाठी पालकांवर प्रलोभनासोबतच साम, दाम, दंड व भेद या सर्व नितीचा वापर होत आहे. काही पालक शिक्षकांच्या या नितीला बळी पडून विद्यार्थ्यांच्या बालमनाचा किंवा परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता मुलांची टी.सी. संबंधिताकडे देवून मोकळे होत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी भविष्यात शाळाबाह्य ठरण्याची दिसून येत आहे. वर्ग ५ वी व वर्ग ८ वी ची टिसी मिळविण्याकरीता शिक्षकांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तके, प्रवास खर्च व नगदी पाच हजार रुपये किंवा त्यांच्यावरचे दर ठरल्याची माहिती काही शिक्षकांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली. या सर्व प्रकारांमध्ये विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षक- शिक्षकांमध्ये मतभेद निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रातील पवित्र व निर्मळ वातावरण दूषित होत आहे, हे मात्र निश्चित. (वार्ताहर)