नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:47+5:302021-04-02T04:29:47+5:30
चंद्रपूर : शहरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस लोकसंख्ख्या वाढत असून नागरिक वाटट्टेल तिथे घरे बांधत आहे. शासकीय जमिनीवरही अनेकांनी ...

नागरिकांचे आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : शहरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस लोकसंख्ख्या वाढत असून नागरिक वाटट्टेल तिथे घरे बांधत आहे. शासकीय जमिनीवरही अनेकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण हटवून रस्त्ये तसेच शासकीय जागा मोकळ्या करण्याची मागणी केली जात आहे.
रोजगार उपलब्ध करण्याची मागणी
चंद्रपूर : औद्योगिक शहर अशी चंद्रपूरची ओळख आहे. मात्र बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याची स्थिती सध्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे वार्डनिहाय बेरोजगारांची नोंदणी करून त्यांच्या हाताला काम देण्याची मागणी केली जात आहे.
अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री
चंद्रपूर : शहरातीलविविध चौकांमध्ये अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले, तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे, आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे देवून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
चंद्रपूर : शहरातील विविध वार्डामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेचे पाईप टाळण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. मात्र वेळीच दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
वाहनतळाचा अभाव
चंद्रपूर : शहरातील काही खासगी शाळांना वाहनतळ नसल्याने विद्यार्थी अगदी रस्त्यावरच सायकल ठेवत आहे. २७ जानेवारीपासून शाळा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, आता परीक्षेचा कालावधी आहे. त्यामुळे सायकल ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना जागाच मिळत नसल्याची स्थिती आहे. शिक्षण विभागाने तसेच वाहतूक पोलिसांनी या शाळांवर कारवाई करून वाहनतळ उभारण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
घंडागाड्यांची दुुरस्ती करावी
चंद्रपूर : शहरात घंटागाडीद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे. मात्र काही वार्डातील घंटागाडींची दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा कचरा रस्त्यावर सांडत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून संबंधित विभागाला कचरा ट्राली दुरुस्ती करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे