शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

पांदण रस्त्यावर अतिक्रमण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST

अतिक्रमण वाढले राजुरा : बहुतांश गावाची शिव आणि ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते ...

अतिक्रमण वाढले

राजुरा : बहुतांश गावाची शिव आणि ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शिव आता संकटात आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून त्याठिकाणी पक्के रस्ते तयार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोंडवाड्यातील

जनावरे असुरक्षित

नागभीड : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहे. मात्र सध्या या कोंडवाड्याची दुरवस्था झाली आहे. कोंडवाड्यामध्ये चारा आणि जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे अत्यावश्यक आहे. मात्र ती करण्यात येत नसल्याचे ते जनावरे असुरक्षित आहे.

कुत्र्यांच्या हैदोसाने

नागरिक त्रस्त

सिंदेवाही : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना हे मोकाट कुत्रे अचानक गाडीवर झेप घेतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

वरोरा डासांचा

प्रादुर्भाव वाढला

वरोरा : शहरातील काही वाॅर्डात नाल्यांची साफसफाई न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नगरपालिकेकडून काही वाॅर्डात फवारणी करण्यात आली होती. त्यानंतर ही कामे बंद आहेत. त्यामुळे फवारणी पुन्हा सुरू करण्याची मागणी युवकांनी केली आहे.

देवघाट मार्गावर

अपघाताची शक्यता

कोरपना : कोरपना ते गडचांदूर महामार्गावरील खिर्डी ते देवघाट दरम्यान रस्त्यावरील वळणावर झुडपे वाढले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. मात्र रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपामुळे वळणावर पुढील येणारे वाहन दिसत नाही.

गंजवार्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी

चंद्रपूर :येथील गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. मात्र दुर्गंधीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.

अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

जिवती: येथील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अडचण जात असून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करून दिलासा देण्याची गरज आहे.

बेरोजगार युवकांना

कर्ज देण्याची मागणी

गोंडपिपरी : तालुक्यात उद्योगांचा अभाव आहे. बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. उद्योग नसल्याने युवकांमध्ये निराशा पसरत आहेत. बँकांकडून कर्ज मिळत नाही. परिणामी, युवकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगारासाठी कर्ज देण्याची मागणी केली जात आहे.

दुरसंचार सेवा

सुरळीत करा

घुग्घुस : भारतीय दूरसंचार विभागाच्यावतीने ग्राहकांना देण्यात येणाºया अत्यंत ढिसाळ सेवेमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. बीएसएनएल मोबाईल व इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांना अडचण जात आहे.

प्लास्टिकचा वापर

निर्बंध नाही

वरोरा : शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढतच आहे. येथील अनेक वॉर्डातील दुकानांमध्ये व अन्य बाजाराच्या ठिकाणी गरज नसतानाही पिशव्या देण्यात येतात. या पिशव्या कुठेही टाकून दिल्या जात आहेत. यातून नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

पोंभुर्णा : गावागावात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र, काही ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आदिलाबाद महामार्गावर धोकादायक खड्डे

कोरपना : चंद्रपूर-कोरपना-आदिलाबाद आंतरराज्यीय व वणी मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील सोनुर्ली ते देवघाट, कोठोडा व वणी मार्गावरील कोरपना ते कोडशी (खुर्द) दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ट्राफिक सिग्नल

बसविण्याची मागणी

वरोरा : येथील आनंदवन चौक व डॉ. एपीजे अब्दुल कलाम चौकात रहदारी रस्त्यावर महाविद्यालय, कॉन्व्हेंट अशा शैक्षणिक संस्था आहे. महारोगी सेवा समितीद्वारा निर्मित आनंदवन, नागरी वसाहत, बाजारपेठ व आठवडी बाजारही त्या रस्त्यावरच भरतो. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी आनंदवन आणि एपीजे अब्दुल कलाम चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.