शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पगारवाढीमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच ‘दिवाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:30 AM

बल्लारपूर : येथील बल्लारपूर पेपर मिल कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली असून प्रतिमहा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रत्येकी किमान ३९७२ ...

बल्लारपूर : येथील बल्लारपूर पेपर मिल कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली असून प्रतिमहा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रत्येकी किमान ३९७२ रुपये, तर कमाल ५०८० एवढी घसघशीत वाढ आहे. यासोबतच कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना व्यवस्थापनाकडून विविध सवलती दिल्या जाणार आहेत.

पेपर मिल कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रत्येक तीन वर्षांनी एकदा वाढ (ग्रेडेशन) होत असते. त्याप्रमाणे पुढील तीन वर्षांकरिता व्यवस्थापन आणि पेपर मिल मजदूर सभा यांच्या चर्चेतून ही पगार वाढ करण्यात आहे. पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व्यवस्थापनाकडून सीओओ नीरज अग्रवाल, युनिट हेड उदय कुकडे, उपाध्यक्ष रणजी अब्राहम, जी. एम. एच. आर. प्रवीण शेखर, डीजीएम अजय दुरुगकर, तर मजदूर सभेकडून महासचिव वसंत मांढरे, उपाध्यक्ष तारासिंग कलसी, तसेच रामदास वागदरकर, वीरेंद्र आर्य, सुभाष माथनकर, अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, आशिष मेहता, के. व्ही. रेड्डी, राजेंद्र शुक्ला, सुदर्शन पुल्ली यांनी चर्चेत भाग घेतला होता. त्या कराराप्रमाणे स्थायी ७८८ कर्मचाऱ्यांना किमान ३९७२ व कमाल ५०८० वाढ झाली आहे. डेलीपेड १०२ कामगारांना व कंत्राटी कामगारांना प्रतिदिन ४५.५ रुपये, दुसऱ्या वर्षी ४७.५ रुपये व तिसऱ्या वर्षी ५० रुपये अशी वाढ मिळणार आहे. ही वाढ १ जुलै २०२० पासून लागू होत असून थकीत एकूण १० कोटी ४३ लाख ४६ हजार रुपये कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. सर्वत्र उद्योगाला मरगळ बसली असून ते आर्थिक संकटातून जात असताना पेपरमधील कर्मचाऱ्यांची त्रिवार्षिक पगारवाढ उल्लेखनीय म्हणावु लागेल. यामुळे कर्मचारीवर्ग सुखावला आहे.