विद्युत बिलात घोळ
By Admin | Updated: July 8, 2017 00:43 IST2017-07-08T00:43:27+5:302017-07-08T00:43:27+5:30
मागील काही महिन्यांच्या वीज बिलात प्रचंड घोळ झाला आहे. त्यामुळे विद्युत बिलात प्रचंड वाढ होत आहे. परिणामी वीज बिल ग्राहकांना बिल भरणे कठीण जात आहे.

विद्युत बिलात घोळ
वीजबिल कमी करावे : भारिप बहुजन महासंघाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही महिन्यांच्या वीज बिलात प्रचंड घोळ झाला आहे. त्यामुळे विद्युत बिलात प्रचंड वाढ होत आहे. परिणामी वीज बिल ग्राहकांना बिल भरणे कठीण जात आहे. त्यामुळे वीज बिलातील घोळ बंद करुन वीज बिल कमी करण्याच्या मागणीचे निवेदन भारिप बहुजन संघाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या महाप्रबंधकांना निवेदन देण्यात आले आहे.
दिल्ली राज्यात अत्यंत कमी दरात वीज देण्यात येत. मात्र महाराष्ट्र राज्यात त्यांच्या तीनपट जास्त दर आकारले जाते. चंद्रपूर जिल्ह्यात वीज निर्मिती करणारा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. तरीसुद्धा जिल्ह्यातील नागरिकांना अतिरिक्त बील पाठविण्यात येते. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोळत आहे.
जिल्ह्यात शेतकरी वर्ग, मजूर वर्ग, तसेच कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी वीज बिल ग्राहकांना ३५० ते ६०० रुपयांच्या दरम्यान वीज बिल येत होते. तेच वीज बिल भरणे या ग्राहकांना जड जात होते. मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून वहन आकार, स्थिर आकार, वीज शुल्क व इंधन समायोजन आकार आदी करात वाढ करुन वीज बिलात वाढ करण्यात आली आहे. परिणामी ग्राहकांच्या वीज बिलात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत आहे. त्यामुळे विद्युत बिलातील घोळ कमी करुन वीज बिल कमी करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपणीच्या महाप्रबंधकांना देण्यात आले. तर निवेदनाच्या प्रती उर्जामंत्री तथा पालकमंत्री यांना पाठविण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे, उपाध्यक्ष अमोल कातकर, आकाश रायपूर, अंकुश कस्तूरे, अनिल वनकर, नितीन बोरकर, राहूल लाटेलवार, अब्रार सय्यद, गजानन मडावी, एस.डी. सावलीकर, शुभम वाढई आदी उपस्थित होते.